मुंबई : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी आमदार नितेश राणे हे सावंतवाडी जिल्हा कारागृहात दाखल झाले होते. दरम्यान जामीन मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी इशारा दिला आहे.
नागपूरात नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन; भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
मला कोणी अटक करू शकले नाही. माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः सरेंडर झालो अशी प्रतिक्रिया आमदार तथा भाजपा नेते नितेश राणे यांनी दिली आहे. दरम्यान थोडे दिवस आता आराम करणार आहे. त्यानंतर मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना बीपीचा त्रास होईल हे मात्र निश्चित असा इशाराही त्यांनी दिली आहे. विरोधकांकडून सुरु असलेले राजकारण अत्यंत खालच्या पद्धतीचे असल्याचे त्यांनी यावेळी ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींची आज म्हापश्यात जाहीर सभा; भाजपकडून जंगी तयारी
कोल्हापुर रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर नितेश राणे सावंतवाडी येथील उप-जिल्हा कारागृहात आले होते. यावेळी त्यांना जामिनाची पूर्तता केली. “मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. पोलीस तपास कामात अडथळा येण्यासारखे काही केले नाही. मी जबाबदारीने वागत होतो, परंतु नाहक राजकीय त्रास देण्याचा प्रयत्न झाला. ज्या दिवशी स्वतः पोलिसांकडे हजर झालो तेव्हा न्यायालयाने दिलेल्या सुरक्षेतील चार दिवस बाकी होते. परंतु त्या ठिकाणी माझी गाडी जाणीवपूर्वक अडवण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील माझ्या लोकांना त्रास नको म्हणून मी माझ्या कुटुंबीय व वकिलांशी चर्चा करून मी सरेंडर झालो. मला ते कोणी अटक करू शकले नाही,” असे ते म्हणाले.
अमरावतीत आयुक्तांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी; आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल
“आता या ठिकाणी आल्यानंतर दोन चार दिवस आराम करणार आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दोन दिवस राहणार आहे. त्याठिकाणी काही तपासण्या केल्यानंतर उर्वरित तपासण्या मुंबईत जाऊन करणार आहे,” अशी माहित नितेश राणे यांनी दिली.
मजबूत भाजपसाठी जोशुआंना पाठबळ द्या; अभिनेता किशन कुमार यांचे आवाहन
“माझ्या तपासण्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. मशीनद्वारे तपासणी झाली. माझा ब्लड प्रेशर, शुगर अशा गोष्टी वाढल्या हे सत्य होते. परंतु त्या ठिकाणी नाहक टीका करण्यात आली. अशा गोष्टीत राजकारण करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून योग्य नाही,” असं नितेश राणे म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली मुख्यमंत्री अधिवेशन काळात आजारी का पडतात असा प्रश्न केला तर चालेल का? अशी विचारणा त्यांनी टीका करणाऱ्यांना केली.
Read also:
- हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: तरुणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अखेर जन्मठेपेची शिक्षा
- मोठी बातमी: राज्यातील १० महापालिकेच्या निवडणूका पुढे जाणार? मार्च-एप्रिल ऐवजी जुन-जुलैमध्ये?
- किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही – चंद्रकांत पाटील
- अटक करुन जेलमध्ये टाका, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आमदार रवी राणांचा गंभीर आरोप
- महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवडमध्ये ‘त्रिसूत्री’