मुंबई : अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अलिकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पक्षाकडून त्यांनी ही घोषणा केली आहे.
“हा वाघ बाहेर येताच पहिला वाघ नखाचा पंजा कोणाला मारणार ?”
भाजपकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिल्याने आता ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील अनेक राजकीय पक्षातील नेत्याचं असंच म्हणण होतं की, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आता ही निवडणुक बिनविरोध झाली पाहिजे.
“गृहविभाग आता फडणवीस सांभाळताहेत, समाजकंटकांनी लक्षात घ्या”; गिरीश खत्री
भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुरजी पटेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी एकदम खुश आहे आणि पक्षाचा आदेश मानणार आहे. त्यावर तुम्ही अपक्ष निवडणुक लढवणार का ? असं विचारल्यावर ते म्हणाले की, अजिबात नाही. असं आपण पक्षाच्याच आदेशाचं पालन करणार असल्याचंही त्यांनी पुन्हा सांगितले.
निवडणुकीआधी ठाकरेंनी रण जिंकला..! हायकोर्टात ठाकरेंच्या बाजूने निर्णय
अंधेरी पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने मतदार संघातील काही कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मतदार संघात राडा होण्याची शक्यता आहे. तसेच काही कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. तसेच यावेळी काही अपशब्दांचाही वापर कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Read also
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल!
- “महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं भुजबळांचं काम”; शरद पवारांकडून भुजबळांचा सन्मान
- “विलासरावांचं पडलेलं सरकार भुजबळांनी वाचवलं, आणि आज..” अजित पवार
- “उद्धव ठाकरे अन् राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्यावं, मी आयोगाला पत्र पाठवणार”
- “भविष्य अंधारात ढकलण्याचे पाप करू नये”; काॅंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी