पुणे : नाशिक-पुणे हायस्पीड एवजी रेल्वे कम रोड प्रकल्पाचा विचार करण्यात येत आहे. राज्य सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विचार करून पुढचा निर्णय घेणार आहेत. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला आता ब्रेक लागला आहे. यावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषेद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल करत प्रखर शब्दात टिका केली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या जीवावर भाजप अजून किती काळ सत्ता भोगणार?
आता प्रकल्पाबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत, ते डीपीआर सुरु करताना का घेतले गेले नाही? रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली, तेव्हा का हे आक्षेप नव्हते? नियोजन आयोगाने मंजुरी दिली तेव्हा का हे आक्षेप नव्हते? एवढी वर्षे प्रकल्प पुढे गेल्यानंतर अचानक जर हे आक्षेप येत असतील तर याबद्दल नक्कीच प्रश्न उपस्थित होतात. इतकी वर्षे झोपा काढल्या का? एमआरआयडीसीने डेव्हलप केलेल्या या प्रकल्पाची थेट अंमलबजावणी होतेय, याबद्दल रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांना तर पोटशूळ उठला नाही ना? हा कोणाच्याही व्यक्तिगत हिताचा नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या हिताचा प्रकल्प आहे. असं अमोल कोल्हे यांनी सांगितले.
“संजय राऊत अन् अनिल देशमुखांची दिवाळी तुरूंगातच”; अद्यापही दिलासा नाहीच
एकीकडे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया असा गाजावाजा आपण करत असताना पहिल्यांदा ब्रॉडगेजवर होणारी ही हायस्पीड रेल्वे आहे. ही इंडियन टेक्नॉलॉजी आपण नाकारतोय आणि महागड्या परदेशी टेक्नॉलॉजीला पायघड्या घालतोय. मग आत्मनिर्भर भारत कुठे गेला? सर्व टप्पे या प्रकल्पाने पार केले. सर्व प्रकारच्या मंजुऱ्या, गुंतवणूकपूर्व हालचाली, रेल्वे बोर्डाच्या मंजुऱ्या, नियोजन विभागाची मंजुरी असे सगळे टप्पे पार केल्यानंतर अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित करून हा प्रकल्प गुंडाळला जात आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे अन् उद्याही राहिल”
दरम्यान, जगातील सर्व हायस्पीड रेल्वे जमिनीवरूनच सुरु झाल्या. मग पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेलाच जमिनीवरून नेण्यास विरोध का? राजकीय हेतू बाजूला ठेवून पुणे ते नाशिक या भागातील सर्वांगीण विकासासाठी वरदान ठरू शकणारा हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग अंमलात आलाच पाहिजे. हा प्रकल्प गेला तर ‘त्या’ राजकीय पक्षांच्या कोणत्याही नेत्याला या मतदारसंघात फिरता येणार नाही. यासंदर्भात मा. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे आणि संसदेतही याबद्दल आवाज उठवणार आहे. यातूनही काही मार्ग निघाला नाही, तर हा प्रकल्प व्हावा म्हणून जनआंदोलन करण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही.
Read also
- “शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय केली”
- चंद्रकांत पाटलांची भूमिका म्हणजे भाजपाला घरचा आहेर : चेतन बेंद्रे
- “ठाकरे सरकारचा ‘तो’ निर्णय ही शिंदे सरकारने बदलला”;
- “मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार
- “मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार