पुणे : आज दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर, तणावाचं आणि भीतीचं वातावरण जाणवतं. याचं कारण म्हणजे नागरिकांचे उत्पन्न घटले आहे. वाढत्या महागाईमुळे आणि जीएसटी मुळे खर्चाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचा पगार हा २० हजार आहे. त्याने कसे सण साजरे करावे? घरात जीवनावश्यक असणाऱ्या खाद्य पदार्थावर केंद्र सरकारने ५% जीएसटी लावला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सन २०१४ साली ६० रु, तर पेट्रोल ७० रु प्रती लीटर होते. आता गेल्या आठ वर्षात हे दर १०० री पार गेले आहेत. अशी ऐतिहासिक दरवाढ झाली आहे. सामान्य नागरिकाला रेशन दुकानावर मिळणारे केरोसिन केंद्र सरकारने जाणीवपूर्वक बंद करून उज्वला गॅसची योजना आणली. सन २०१४ साली ४५० रु ना मिळणारा गॅस सिलेंडरचे आजचे दर हे १००० रु.च्या पार गेले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाने एकदा मिळालेले सिलेंडर पुन्हा घेतले नाही.
“संजय राऊत अन् अनिल देशमुखांची दिवाळी तुरूंगातच”; अद्यापही दिलासा नाहीच
केंद्र सरकारने सिलेंडर सक्तीचे केले मात्र वाढत्या किमती पाहता ते सामान्य माणसाला परवडणारे नाही. शालेय वस्तूवर केंद्र सरकारने ५% जीएसटी लावला आहे. त्यामुळे गोड असणारी दिवाळी महागाईने कडवट झाल्याचे दिसत आहे. सामान्य माणूस वर्षातून एकदा दिवाळीला आपल्या मुलांना कपडे खरेदी करत असतो. केंद्र सरकारने कपड्यांवर ५% आणि बुटांवर देखील १२% जीएसटी लादला. दिवाळीला फटाक्यावर देखील टॅक्स लावला आहे. इलेक्ट्रिक आकाश कंदील, शोभेचे लाइट यावर १८% जीएसटी लावण्यात आला आहे. दिवाळीचे फराळ देखील महाग झाले आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूंवर टॅक्स लावून एक प्रकारे लुटच सुरु करून सामान्य माणसाचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम भाजप सरकारने केले.
“मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे अन् उद्याही राहिल”
तर मोदीजी सामान्य माणूस दिवाळी कशी साजरी करणार? ज्याला कुटुंब नाही त्याला याची जाणीव तरी काय होणार? वाढत्या महागाईच्या काळात दिवाळीचा बोनस आणि भेटवस्तू स्वीकारणाऱ्या नोकरदारांना झटका दिला आहे, आता बोनस व भेटवस्तूवर टॅक्स लावला आहे. तसेच खाद्यपदार्थ, तेल, डाळ अशा जीवनाश्यक वस्तु देखील महाग झाल्या आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे दिवाळीत दिवाळे निघाले आहे. याला हे केंद्र सरकार जबाबदार आहे. गेल्या आठ वर्षात महागाई आटोक्यात आणावी यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न केले जात नाही.
“ज्यांना कुळव, कुदळ, दांडा कळत नाही, त्यांना शेतीचं काय कळणार”; सुषमा अंधारे
त्याचप्रमाणे राज्याचीही काही वेगळी परिस्थिती नाही. दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.राज्यातील सुमारे ४० हजार हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. अशा या कठीण प्रसंगी शेतकऱ्याने दिवाळी कशी साजरी करायची, हा मोठा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्याची दिवाळी पाण्यात गेली असून राज्य सरकारने राज्यात अजूनही ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर उत्साह, प्रकाशात घर उजळण्याच्या वेळी घरात अंधार व्हायची वेळ आली. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकरी बांधवाला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय केली आहे. असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे.
Read also
- चंद्रकांत पाटलांची भूमिका म्हणजे भाजपाला घरचा आहेर : चेतन बेंद्रे
- “ठाकरे सरकारचा ‘तो’ निर्णय ही शिंदे सरकारने बदलला”;
- “मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार
- “मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार
- केंद्रीय तपास यंत्रणांच्या जीवावर भाजप अजून किती काळ सत्ता भोगणार?