पुणे : ज्यांना कुळव कळत नाही, दांडा कळत नाही, रूमणं कळत नाही, त्यांना शेतीचं काही कळत नाही. त्यांना का उगाचच त्रास देत आहेत. अस म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला. अलिकडेच जोरदार पाऊस झाल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत असताना राज्यात सध्या तशी परिस्थिती नाही. असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. त्यावर आता सुषमा अंधारे यांनी खरपुस समाचार घेतला.
“राज ठाकरे, शिंदे अन् देवेंद्र फडणवीस एकत्र येणार”; तारिख अन् वेळ ही ठरली ?
ज्यांना हाफिकीन म्हणजे काय ? हे कळत नाही. अशी माणसं आज आरोग्य मंत्री झाली आहेत. तसेच ज्यांना शेतीबद्दल किमान ज्ञान नाहीत अशी माणसं कृषीमंत्री झाली आहेत. त्यामुळे या नेत्यांकडून महाराष्ट्रातील प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. तसेच राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्ताने 20 कोटी फराळाचं किट राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. यावर देखील त्यांनी भाष्य केलं.
“राष्ट्रवादीविरोधात शिंदे-फडणवीसांची पुण्यात मोठी फिल्डिंग”; दोन्ही बांजूचे नेते एकवटले
राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या किटवर फोटो छापले जात आहेत. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, ज्याचं जाहिरातीवरं सगळं चालू आहे. ते तेच करणार आहेत. तसेच राज्य सरकारकडून जे कीट देण्यात येणार आहेत. ते अजून लोकांपर्यंत पोहचलेच नाही. तसेच अतिशय निकृष्ट दर्जाचे तेल सध्या लोकांना दिले जात आहेत. त्यामुळे या गोष्टी देण्यात येऊ नये. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना अडकवलं जात आहे. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “माझी 80 वर्षाची आई, म्हणाली…शिवसेनेत जा.. उद्धव साहेबांना तुझी गरज आहे”; संजय देशमुख
- “संजय राऊतांची दिवाळीही तुरुंगातच”; न्यायालयाने आणखी वाढवली कोठडी
- “साहेब चिंता करू नका, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची राहील”
- “तर येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा दुष्काळ दिसेल”; राष्ट्रवादीचा राज्य सरकारवर निशाणा
- “प्रत्येक जण गट स्थापन करतोय, माझा ही गट लवकरच दिसेल”; दिपाली सय्यद