अमरावती : मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती आज आहे आणि उद्याही राहिल, असं वक्तव्य आमदार देवेंद्र भुयार यांनी केल आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना हात जरी लावला तरी हातच छाटू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. अमरावतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
“प्रत्येक जण गट स्थापन करतोय, माझा ही गट लवकरच दिसेल”; दिपाली सय्यद
यानंतर जर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला हात लावण्याचं काम केलं तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही. तसेच मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे. आणि उद्याही राहणार आहे. तुमची दहशत फक्त नदीच्या किनाऱ्यापर्यंत आहे. आमच्या नादाला लागायचं नाही. मागील काही निवडणुकीत तुम्ही जाणीवपुर्वक धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे यापुढे जर हात लावला तर हात छाटून टाकू असा इशारा देखील त्यांनी विरोधकांना दिला.
“राज ठाकरे, शिंदे अन् देवेंद्र फडणवीस एकत्र येणार”; तारिख अन् वेळ ही ठरली ?
त्याचबरोबर जुना देवेंद्र भुयार यांना जागे करू नका. जर जागा झाला तर तुमची पाटील काढल्याशिवाय राहणार नाही. असा सज्जड दम देखील देवेंद्र भुयार यांनी दिला आहे. अलिकडच्या काळात देवेंद्र भुयार अनेक गोष्टीमुळे चर्चेत आले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील भुयार चर्चेत आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांना सज्जड दम दिला आहे.
Read also
- “ज्यांना कुळव, कुदळ, दांडा कळत नाही, त्यांना शेतीचं काय कळणार”; सुषमा अंधारे
- “माझी 80 वर्षाची आई, म्हणाली…शिवसेनेत जा.. उद्धव साहेबांना तुझी गरज आहे”; संजय देशमुख
- “संजय राऊतांची दिवाळीही तुरुंगातच”; न्यायालयाने आणखी वाढवली कोठडी
- “साहेब चिंता करू नका, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची राहील”
- “तर येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा दुष्काळ दिसेल”; राष्ट्रवादीचा राज्य सरकारवर निशाणा