मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांचे गाव असलेल्या खानापूरमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी हा पराभव म्हणजे आपला पराभव असल्याचा दावा फेटाळला आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी यावेळी पुन्हा एकदा केला. तसेच, येत्या दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन मोठा बॉम्बस्फोट करणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पदवीधर निडणुकीत महाविकास आघाडीने गैरप्रकार केले. या निवडणुकीतील गैरप्रकारांचा उलगडा करणारी मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद मी येत्या दोन दिवसांत घेणार आहे. या निवडणुकीत मोठे गौप्यस्फोट करणार आहे. पदवीधर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडले, असा आरोप त्यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेवटच्या साठ मिनिटांमध्ये 137-138 असं मतदान झालं आहे. हे 900 पौकी 300 बुथवर झालं आहे. मी दोन दिवसांनी जी पत्रकार परिषद घेणार आहे त्यात डेमो दाखवणार आहे. मतदान प्रक्रियेत कितीवेळ लागतो हे दाखवणार आहे. एका मतदाराला तीन मिनिटं लागतात. मग 60 मिनिटांमध्ये 137 मतदान कसं? एवढी मोठी हेराफेरी झाली आहे. तरीही लोकशाहीमध्ये जो निकाल लागला आहे तो मान्य केला आहे. पण हेराफेरी समोर आल्यानंतर तरी मान्य कराल की भाजपचा पराभव नाही आहे.
Read Also :
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी कधीच बाहुबलीचे राजकारण केले नाही’
- ‘असं सरकार चालवता येत नाही’, ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना प्रत्युत्तर
- ‘आप’ने महाराष्ट्रात उघडले खाते, मराठीत ट्विट करत केजरीवाल म्हणाले…
- विना अपघात सेवा देणार्या एसटी चालकांना मिळणार मोठे बक्षीस, अनिल परब यांची घोषणा
- मुस्लिम समाजाच्या ‘किसानबाग’ आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल – प्रकाश आंबेडकर