पुणे : राज्यातील जवळपास 12 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल हाती आले असून, प्रत्येकजण आपल्या पक्षाला अधिक ग्रामपंचायतीवर विजय मिळाल्याचा दावा करत आहे. या निवडणुकीत शिवसेनेला देखील मोठे यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी ग्रामपंचायतींप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही शिवसेना आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
शिवसेनेला संपवू शकतो असा अनेकांना भ्रम होता, राष्ट्रपती राजवट आण्यासाठी महाराष्ट्रात कशी बेबंदशाही सुरु आहे असे वातावरण निर्माण केले होते, त्याला ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये जनतेने मतपेटीतून चपराक दिली आहे. भाजपच्या विषारी प्रचाराला जनता बळी पडलेली नाही, अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर हल्ला चढवला. त्या पुण्यात बोलत होत्या.
आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना ग्रामीण जनतेने साथ दिली, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या. भाजपने शह-कटशहाचे राजकारण करुन लोकांमध्ये गैरसमज पसरवून विषारी प्रचार केला. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कधीही साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून निवडून या असे सांगितले नाही. बाहुबलीचे राजकारण केले नाही, असे त्या म्हणाल्या.
Read Also :
- ‘असं सरकार चालवता येत नाही’, ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना प्रत्युत्तर
- ‘आप’ने महाराष्ट्रात उघडले खाते, मराठीत ट्विट करत केजरीवाल म्हणाले…
- विना अपघात सेवा देणार्या एसटी चालकांना मिळणार मोठे बक्षीस, अनिल परब यांची घोषणा
- मुस्लिम समाजाच्या ‘किसानबाग’ आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल – प्रकाश आंबेडकर
- आठवड्यातील चार दिवस होणार कोरोना लसीकरण, मुख्यमंत्र्यांची माहिती