अदमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. शिवाय तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे संभाजीराजे मराठा आरक्षणप्रश्नी संयमाने भूमिका घेत आहेत. अशा नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. परंतू चंद्रकांत पाटील यांना नेमक काय झालयं, हेच कळना झालयं, सत्ता गेल्यामुळे त्यांचा संताप होत. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्नाला धरून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका अहमदनगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अक्षरश: थैमान घातले होते. ऑक्सिजन, बेड, रेमडेसिविरसाठी नागरिकांची वणवण झाल्याचे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. नगर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी सांगतो, त्यावेळी एक ऑक्सिजन टँकर नगरकडे वळवला नसता तर आज काय अवस्था झाली असती. शिवाय अजूनही आम्हाला बेड, ऑक्सिजनसाठी नागरिकांचे फोन येतात. या सगळ्या गोष्टीची संभाजीराजे यांना जाण आहे, असे म्हणतं त्यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेचे कौतूकही केले.
दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र सावरत असताना मोर्चाच्या गर्दीमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची सर्व गोष्टीची जाण संभाजीराजेंना आहे. त्यामुळे राजे संयमाची भूमिका घेत आहेत. अशा नेतृत्वाची सध्या महाराष्ट्राला गरज आहे. परंतू, भाजप प्रदेशाध्य चंद्राकांत पाटीलांना काय झाले कळत नाही. त्यांची महाराष्ट्रातील सत्तागेल्यामुळे अस्वस्थ झालेतं. त्यामुळे, संभाजीराजेंना सतत हिनवत असतात. आंदोलनासाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करत राहतात, अशी टिका मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे.
Read Also :
- मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली – राहुल शेवाळे
- पवार, चव्हाण आम्हाला महत्वाचे नाहीत; पंतप्रधानांशी काय चर्चा झाली नीट जाहीर करावं; मेटेचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा चेहरा नवा…आता आम्हाला पार्थ पवारच हवा!
- वंचित आघाडी-संभाजीराजे मेतकूट जमल्यास, शिवशाहीला नाही ‘पेशवाई’ला फटका
- मंत्र्यांचे आजोबा-पणजोबाही वारीला जातात, सरकारने विचार करूनच निर्णय घेतलायं – भुजबळ