मुंबई : भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री अजून हॉलिडे मूडमध्येच आहेत. तर गृहमंत्री अजून वीकेंड मूडमधून बाहेर पडलेले नाहीत, असे त्या म्हणाल्या. हे सरकार तालिबान्यांच्या हातात सोपवलं आहे का, असा खडा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
आशिष शेलार सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलतात, म्हणून त्यांना धमकी; देवेंद्र फडणवीसांचा दावा
आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून आता भाजपने राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘भाजपचे नेते आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांना फोनवरून विखारी भाषा वापरून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. इतके तास उलटूनही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा सुस्त आहेत,’ असे त्या म्हणाल्या. राज्यातील महत्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्य सरकार तालिबान्यांच्या हातात दिले आहे का, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
भाजपाचे जेष्ठ नेते @ShelarAshish यांना व त्यांच्या परीवाराला विखारी भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली गेलीये@CMOMaharashtraसरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का?
एकीकडे मुख्यमंत्री हॉलीडेमुड मध्ये तर गृहमंत्री विकेंडमुड मधून बाहेर पडले नाहीत
राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये?? pic.twitter.com/lN3Jw5TInc— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 8, 2022
एकीकडे मुख्यमंत्री हे हॉलिडे मूडमध्ये आहेत, तर गृहमंत्री अद्याप वीकेंड मूडमधून बाहेर आलेले नाहीत. राज्यात सरकार नावाची गोष्ट उरली आहे का? असा सवालही त्यांनी केला. हे सरकार पार्टटाइम काम करत आहे. शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणाऱ्यांच्या २४ तासांच्या आत मुसक्या आवळा, शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांना काही झाले तर, त्याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असतील हे लक्षात ठेवावे, असेही वाघ म्हणाल्या.
Read also:
- पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ खेडमध्येच होण्यासाठी आमदार लांडगे यांची ‘वज्रमूठ’
- पाच राज्यांतील निवडणुकांचे बिगुल वाजले; १४ फेब्रुवारीपासून सात टप्प्यांमध्ये होणार निवडणुका
- माझ्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार अधिकारी भाजपाचाच दलाल; मंत्री अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप
- …तर अशा पंतप्रधानांचा काय फायदा; मंत्री विजय वडेट्टीवारांचा नरेंद्र मोदींवर निशाणा
- जयदत्त अण्णांचा पुतण्याला धक्का; संदीप क्षीरसागरांना काकांच्या विरोधात साधा उमेदवारही देता आला नाही