नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये आजचं बिगुल वाजलं आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका, कोरोनाच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आज (8 जानेवारीध निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी या पाच राज्यांमध्ये कडक कोरोना प्रोटोकॉलच्या छायेत विधानसभा निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या तारखांची सर्व अपडेट जाणून घ्या सविस्तर.
येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र हे इतर दोन निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अनूप चंद्र पांडे यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उ
उत्तरप्रदेशमध्ये 7 टप्प्यांमध्ये होणार निवडणुका
पाचही राज्यातील सर्वात महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय यावेळी निवडणूक आयोगाने घेतला आहे. तर इतर तीन राज्यांमध्ये एक टप्प्यात तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल कधी?
पाचही राज्यात वेगवेगळ्या दिवशी निवडणूक होणार असल्या तरीही सर्व राज्यात एकाच दिवशी म्हणजे 10 मार्च 2022 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता पाचही राज्यात नेमकी कोणाची सत्ता येणार हे बरोबर दोन महिन्यांनी समजणार आहे. या सगळ्यात कोरोनाची तिसरी लाट आणि कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रमाची आखणी केली आहे.
निवडणूक प्रचार सभा, रॅली यांना 15 जानेवारीपर्यंत पूर्णपणे बंदी
एकीकडे कोरोनाचं संकट गडद होत असताना दुसरीकडे मात्र, आज पाच राज्यातील निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, यावेळी निवडणूक आयोगाने कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला जाहीर सभा, रॅली किंवा इतर प्रचार सभा प्रत्यक्षरित्या घेण्यास 15 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. 15 जानेवारीनंतर पाचही राज्यातील स्थिती काय आहे हे लक्षात घेऊनच निवडणुकांच्या प्रचार सभांना परवानगी द्यायची की नाही त्याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. मात्र, असं असलं तरीही ऑनलाइन प्रचार सभा राजकीय पक्षांना घेता येणार आहे. असंही निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुशील चंद्र यांनी स्पष्ट केलं आहे.
Read also:
- माझ्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार अधिकारी भाजपाचाच दलाल; मंत्री अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप
- …तर अशा पंतप्रधानांचा काय फायदा; मंत्री विजय वडेट्टीवारांचा नरेंद्र मोदींवर निशाणा
- जयदत्त अण्णांचा पुतण्याला धक्का; संदीप क्षीरसागरांना काकांच्या विरोधात साधा उमेदवारही देता आला नाही
- आशिष शेलार सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलतात, म्हणून त्यांना धमकी; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- २२ फेब्रुवारीला यशवंत ब्रिगेडचा मंत्रालयावर महामोर्चा धडकणार; काय आहे नेमकी मागणी?