मुंबई : वैद्यकीय शिक्षणात ओबीसींना २७ टक्के आरक्षण कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. हा निर्णय न्यायालयाने दिल्याचे आम्हाला समाधान आहे. सात वर्षे ओबीसी पंतप्रधान असूनही ओबीसींना न्याय मिळत नसेल तर काय फायदा आहे, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
विकासकामांमध्ये टक्केवारी खाण्याची पीएचडी झालेल्यांची माझ्यावर बोलायची लायकी नाही – राजू पाटील
घटनात्मक तरतूद असताना ते आजवर मिळाले नव्हते. हे लक्षात आणून देताना देशात ओबीसी पंतप्रधान सत्तेवर असताना करावा लागलेला संघर्ष अपेक्षाभंग करणारा असल्याचा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. ओबीसी बांधवांनी आणखी एक लढाई जिंकल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. अनेक वर्षांपासून अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढलेली आहे. खरे पाहता केंद्र सरकारनेच हा निर्णय घेण्याची अपेक्षा होती, असेही वडेट्टीवार म्हणाले.
भाजप आमदार आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; कुटूंबही संपवण्याचा दिला इशारा
राज्याच्या वाट्याला ज्या १५ टक्के जागा मिळतात त्या कोट्यातून २७ टक्के आरक्षण दिले गेले आहे. सारासार विचार करता देशात ओबीसींच्या जेवढ्या जागा असतात त्यामध्ये २७ टक्के आरक्षण ओबीसींना नव्हते आणि केंद्र सरकारची भूमिका याबाबत नेहमीच दुटप्पीपणाची राहिली आहे. केंद्राला हे आरक्षण द्यायचेच नव्हते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. यातील ओबीसी, व्हिजेएनटी अशा बहुजन समाजातील तरुणांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
Read also:
- जयदत्त अण्णांचा पुतण्याला धक्का; संदीप क्षीरसागरांना काकांच्या विरोधात साधा उमेदवारही देता आला नाही
- आशिष शेलार सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलतात, म्हणून त्यांना धमकी; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- २२ फेब्रुवारीला यशवंत ब्रिगेडचा मंत्रालयावर महामोर्चा धडकणार; काय आहे नेमकी मागणी?
- येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा
- शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; कोट्यावधीची बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप