मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला भागाला मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह आजुबाजूच्या भागांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो झाडं कोलमडून पडली आहेत, तर घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करत नुकसानीची भागांची पाहणी करणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे चक्रीवादळानंतर नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर होते. आता त्यानंतर मुख्यमंत्री देखील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना भेट देणार आहेत.
तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (२१ मे) रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत तसेच प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा
सकाळी ८.३५ वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन
सकाळी ०८.४० वाजता “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक
सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन आणि गाडीने वायरी ता. मालवणकडे प्रस्थान
सकाळी १०.१० वाजता वायरी, ता.मालवण येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी १०.२५ वाजता गाडीने मालवण येथे आगमन व तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी ११.०५ वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
या पहाणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रस्थान
दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन आणि विमानाने मुंबईकडे प्रस्थान
Read Also :