मुंबई : महामारीच्या व्यवस्थापन आणि नियोजनावरून आधीच केंद्र सरकार टीकेचे धनी झालेले असताना, आता केंद्र सरकारवर रासायनिक आणि मिश्र खतांच्या दर वाढीच्या निर्णयावरून हल्लबोल केला जात आहे.
राज्यातील अनेक नेत्यांनी यासंदर्भात आपली भूमिका थेट संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवली असून, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत थेट केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून, केंद्र सरकारने वाढवलेले रासायनिक खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर आज मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत, डीएपी खतांच्या किंमतीवरील सब्सिडी १४० टक्क्यांनी वाढवली असून, आता डीएपी खताची एक बॅग शेतकऱ्यांना जुन्याच किंमतींना मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी, ‘शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुधारण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, त्यामुळे खतांच्या किमतींमध्ये जागतिक वाढ होऊन देखील सरकार देशातील शेतकऱ्यांना खते जुन्याच दराने उपलब्ध करून देत आहे”, असे सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाचं श्रेय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं आहे, त्यांच्याच पत्रामुळे आणि दबावामुळे केंद्र सरकारला आपला खत दर वाढीचा निर्णय मागे घ्यावा लागला, अशा प्रकारची चर्चा समाज माध्यमांवर राष्टवादीकडून उठवली गेली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी याच श्रेय शरद पवारांसह इतर नेत्यांना देणारी ट्विटस केली. यावर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी कडाडून टीका केली आहे.
काही चांगल झालं की साहेबांनी केलं .
शेतकऱ्याची वीज तोडली तेव्हा साहेबांच्या खिशातील पेनाची शाही संपली होती का?
तेव्हा का नाही ठाकरे सरकारला पत्र लिहलं ?@RRPSpeaks फुकटचे गुणगान गायचे आणि पोकळ श्रेय गळ्यात पाडून घ्यायचे दिवस गेले आता.
आपलं Software अपडेट करून घ्या @RRPSpeaks . https://t.co/l1pSQfTYVE— Ram Satpute (@RamVSatpute) May 20, 2021
“काही चांगल झालं की साहेबांनी केलं . शेतकऱ्याची वीज तोडली तेव्हा साहेबांच्या खिशातील पेनाची शाही संपली होती का? तेव्हा का नाही ठाकरे सरकारला पत्र लिहलं ? रोहित पवार तुमचे फुकटचे गुणगान गायचे आणि पोकळ श्रेय गळ्यात पाडून घ्यायचे दिवस गेले आता. आपलं Software अपडेट करून घ्या रोहित पवार”, असा हल्लबोल केला आहे.
Read Also :
- नितीन राऊत राजीनामा द्या! मराठा समाजाची आक्रमक मागणी
- आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी शरजील उस्मानीवर जालन्यात गुन्हा दाखल
- जनता आपलं भविष्य म्हणून दोघांकडेही पाहत नाही
- हीच असेल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, “उद्धव ठाकरे घराबाहेर पडले!”
- मुख्यमंत्र्यांचा उद्याचा कोकण दौरा, म्हणजे ‘फोटोसेशन आणि लिपस्टिक’ दौरा