मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने कर्नाटक, गोवा आणि राज्याच्या प.किनारपला मोठा तडाखा दिल्यानंतर, गुजरात आणि दीवमध्ये देखील हैदोस घातला. या वादळामुळे दोन्ही प्रदेशात प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून, त्याची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई मार्गाने केली. तसेच, या वादळाने राज्याच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
सध्या राज्यात यावरून राजकारण सुरु असून, राजकीय नेते एकमेकांवर टीकाफेक करत आहेत. यातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून, “पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही”, असा शाब्दिक टोला लगावला आहे.
पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 20, 2021
दरम्यान, त्यांनी काल देखील या दोघांवर टीका केली होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील,” अशी खोचक टीका त्यांनी केली होती.
Read Also :
- हीच असेल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, “उद्धव ठाकरे घराबाहेर पडले!”
- “मोदी जी, हमारे बच्चोंके वैक्सीन विदेश क्यों भेज दिये?”
- योग्य वेळी ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू; देवेंद्र फडणवीसांचा पुनर्उच्चार
- राज्यातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं; राज ठाकरेंची कलावंतासोबत ‘झूम’ मिटिंग
- मी छत्रपतींचा वंशज, आदोलन काय असते हे मला शिकवू नये – संभाजीराजे भोसले