मुंबई : २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची मोठी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली महाविद्यालये उघडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांना दोन डोस घेणं आवश्यक आहे.
अजित पवार अडचणीत येणार; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या दादांच्या सहीचा कागद दाखवणार
५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू होणार आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने गोष्टी पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सामंत म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेलं नाही, अशांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना नो एन्ट्री; व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण भोवल?
राज्यातील सेट नेट पास झालेल्या प्राध्यापकांची पेन्शनची रक्कम थकित होती. ४ हजार १३३ प्राध्यापकांची पेन्शन थकल्याने याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलय. नियुक्त झालेल्या तारखेपासून या प्राध्यापकांना पेन्शनची रक्कम मिळणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
Read Also :
- मोठी बातमी: अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींच पॅकेज जाहीर; ठाकरे सरकारचा निर्णय
- …तर मावळात राष्ट्रवादीचा आमदार ९० हजार मतांनी कसा निवडून आला? पवारांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न
- अनिल देशमुखांच्या घरावर पाचवेळा छापेमारी, आरोप करणारे मात्र आता कुठे दिसत नाहीत – शरद पवार
- फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिटमारी झाली तरी बातम्या चालायच्या – चंद्रकांत पाटील
- भाजपमध्ये मस्त निवांत आहे, चौकशी वगैरे काही नाही, शांत झोप लागते – हर्षवर्धन पाटील