मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातले राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं असून, विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून आक्रमकपणे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका आणि आरोप कारण्यात येत आहेत. तसेच, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची देखील मागणी, भाजपकडून सातत्याने केली जात आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी आपली प्रतिक्रिया आक्रमकपणे दिली असून, त्यांनी ट्विट करत “मराठा आरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत आणि ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चांचे इशारे देते आहे. दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे. हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही. बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?,” असा जोरदार निशाणा भाजपवर साधला आहे.
#मराठाआरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत आणि ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चांचे इशारे देते आहे.
दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे.
हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही.
बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 28, 2021
तसेच, काल देखील त्यांनी या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली होती, “मराठा आरक्षणाला घेऊन भाजपाने घेतलेली भूमिका ही फक्त दिखावा म्हणू घेतली असून, त्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचं केवळ राजकारण करायचं आहे,” या शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली होती.
Read Also :
- ‘भाजपला सोडचिट्ठी देणार, की थेट नवा पक्षचं काढणार? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आज
- इयत्ता १० वीचा फॉर्म्युला ठरला.! नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन विद्यार्थ्यांचे मूल्यांकन
- ठाकरे सरकार राज्यातला लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवणार!
- पंतप्रधानांमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही?
- चंद्रकांत पाटलांना स्वप्नं बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?