मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारविरोधात खळबळजनक वक्तव्य केले असून, देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले होते, “झोपेतून उठलो तर सरकार गेलं होतं, इतका विश्वासघात झाला. केसाने गळाने कापतात म्हणतात ते हे. तुम्ही सरकार कधी पडणार विचारत आहात, मी सांगतो की, असेच सगळे झोपेत असतील तेव्हा हे सरकार पडेल आणि कुणाला कळणारच नाही आघाडी सरकार कधी गेलं,” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी ते बोलताना केला होता.
दरम्यान, यावर राज्याचे जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर पलटवार केला असून, “महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे, आता चंद्रकात दादांनाच स्वप्न पडण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार?,” असं टोला लगावला आहे. ते आज पुण्यात साखर संकुलात झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.
तसेच, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली आहे. ‘राज्याचं अधिवेशन घेण्याची यांच्यात हिम्मत नाही’, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला होता. पाटील यांच्या या टीकेचा संदर्भ घेऊन जयंत पाटील यांनी, “पंतप्रधानांच्यात सुद्धा अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही, यावर चर्चा होऊ शकते. अधिवेशन न घेण्याचं जे कारण त्यांना लागू पडतं तेच राज्याला लागू आहे. सगळ्या राज्यांमध्ये एकच परिस्थिती आहे,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- आज मांडणार संभाजीराजे निर्णायक भूमिका; काय असणार राजेंची रणनीती
- नियुक्तीपत्रं कसं द्यायचं हे मला शिकवू नका, ५ वर्ष खातं संभाळलयं
- ‘पदोन्नतीमधील आरक्षणावर पाठिंबा काढण्याचा देणाऱ्या काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट दिलंय’
- ‘1 जून नंतर लॉकडाऊन राहणारच, मात्र…’
- ‘गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हे राज ठाकरेंचंही मत’