मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. 1 जूननंतर लॉकडाऊन शिथिल होणार की निर्बंध वाढणार असा प्रश्न विचारला जात आहे. यातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर बोलताना 1 जून नंतर लॉकडाऊन राहणारच आहे, मात्र हळूहळू निर्बंध शिथिल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राजेश टोपे म्हणाले की, सरसकट लॉकडाऊन उठवणार हा विषय अजिबात नाही. लॉकडाऊन जो आज आहे, तो तसाच राहून त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. मग ती शिथिलता काही तास वाढवण्याची आहे का? जास्त दुकाने उघडण्याची आहे का? हे सगळे जे बारकावे आहेत.
राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतरही सरसकट उठवता येणार नाही मात्र, काही ठिकाणी जिथे रुग्णसंख्या कमी आहे तिथे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिथिलतेचे जे बारकावे आहेत, ते बारकावे टाक्स फोर्ससोबत चर्चा करून निश्चित करण्यात येतील. लॉकडाऊनमधील शिथिलता आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केली जाईल, असे म्हणाले.
Read Also :