मुंबई : चंद्रपुरात लावण्यात आलेली दारुबंदी उठवण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, आता या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठत आहे. ‘आघाडीचे नेते सत्तेच्या नशेत, जनता मात्र हालात बेहोश’, अशा शब्दात भाजप नेते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. दारूबंदी उठवावी अडीच हजार निवेदने दिली होती. अवैद्य आणि डुप्लिकेट दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळं दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. मात्र, अता या निर्णयावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका होत आहे.
दारूबंदी उठवली,
परीक्षा बंदी कायम..दारूविक्रेत्यांची चिंता
महिला सुरक्षेचं तीनतेरासुरापानाला प्रोत्साहन
दुधउत्पादक मात्र वाऱ्यावरआघाडीचे नेते सत्तेच्या नशेत
जनता मात्र हालात बेहोशकोरानाविरोधी ‘स्पिरीट’ असच वाढवल पाहिजे अस @OfficeofUT सरकारला वाटत असाव
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 28, 2021
दारूबंदी उठवली, परीक्षा बंदी कायम.. दारूविक्रेत्यांची चिंता, महिला सुरक्षेचं तीनतेरा… सुरापानाला प्रोत्साहन, दुधउत्पादक मात्र वाऱ्यावर… आघाडीचे नेते सत्तेच्या नशेत..जनता मात्र हालात बेहोश कोरानाविरोधी ‘स्पिरीट’ असच वाढवल पाहिजे अस ठाकरे सरकारला वाटत असाव, असा जोरदार टोला आता केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील या निर्णयावरून सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ या सरकारला आहे, अशी टीका त्यांनी केली.
Read Also :
- ‘गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हे राज ठाकरेंचंही मत’
- ‘सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा’
- … त्यामुळे चंद्रपुरमधील दारु बंदी उठवली, वडेट्टीवारांनी सांगितले कारण
- ‘शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं?’
- ठाकरे सरकारने गृह विलगीकरणाचा निर्णय बदलला, आमदार महेश लांडगेंच्या प्रयत्नांना यश