चंद्रपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपुरात लावण्यात आलेली दारुबंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून दारूबंदी उठवण्याची मागणी सुरू होती. बंदीत देखील अवैधरित्या दारुविक्री असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळाले होते. दारुबंदीमुळे जिल्ह्यात अवैध दारुची विक्री आणि गुन्हेगारी फोफावली होती. आता अखेर मंत्रिमंडळाने दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. दारूबंदी उठवावी अडीच हजार निवेदने दिली होती. अवैद्य आणि डुप्लिकेट दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळं दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता.
जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली असल्याचे त्यांनी सांगितले.
दारूबंदीवर नियंत्रण ठवणे शक्य झाले नाही. अनेक लोक डुप्लिकेट दारूच्या व्यवसायात गुंतले होते. लहान मुलं यात गुंतली होती. ड्रग्स विक्री होत होती. त्यामुळं बैठकीत दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
Read Also :
- ‘शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं?’
- ठाकरे सरकारने गृह विलगीकरणाचा निर्णय बदलला, आमदार महेश लांडगेंच्या प्रयत्नांना यश
- शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा
- ‘म्युकरमायकोसिसच्या मोफत उपचाराबाबतची सरकारची घोषणा फसवी’
- ‘भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या’