मुंबई : राज्यात सध्या लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत १ जून च्या सकाळी ७ वा. संपत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता पुढे काय निर्णय घेणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, राज्यातील रेड झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यातील लॉकडाऊन १ जूननंतर आणखीन १५ दिवसांनी वाढवण्याच्या निर्णयावर विचार सुरू असल्याचे सूतोवाच केले आहे. मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये महामारीने बाधित झालेल्या रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे, तसेच मृत्यूदरही कमी झाल्याचे चित्र दिसत आहे, अशा जिल्ह्यामंध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथीलता आणली जाईल,” अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे.
यावेळी, म्युकरमायकोसिसने बाधित असलेल्या रुग्णांनी, मोफत उपचारांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा. राज्यातल्या १३१ रुग्णालयांमध्ये या आजारावर मोफत उपचार करण्यात येत आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसेच, केंद्र सरकारकडे बोट दाखवत त्यांनी, ‘म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचं नियंत्रण केंद्राकडे आहे. सरकारकडून राज्याच्या झोळीत जेवढे इंजेक्शन येतील त्याप्रमाणेच वाटप केलं जात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच त्यांनी, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत देशाने अजून कोणतंही धोरण ठरवलेलं नसून, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका ओळखून राज्य सरकार मात्र सगळी तयारी करत आहे,” असं सांगितलं आहे.
काल त्यांनी सध्या केंद्राकडून कोविशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुटनिक या ३ लसींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. बाकी इतर लसींना परवानगी देण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. त्यामुळे लसींच्या आयातीबाबत राष्ट्रीय पातळीवर एक धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं सांगितलं होतं.
तसेच, ग्लोबल टेंडरमध्ये मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, एस्ट्राझेनेका, जॉन्सन एन्ड जॉन्सन्स या कंपन्यांकडून प्रतिसाद आला आहे. यापैकी काही कंपन्यांनी किंमत दिली आहे, तर काही कंपन्यांनी किमतीबाबत काहीच स्पष्ट कल्पना दिली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
Read Also :
- पंतप्रधानांमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही?
- चंद्रकांत पाटलांना स्वप्नं बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?
- आज मांडणार संभाजीराजे निर्णायक भूमिका; काय असणार राजेंची रणनीती
- ‘पदोन्नतीमधील आरक्षणावर पाठिंबा काढण्याचा देणाऱ्या काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट दिलंय’
- ‘गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हे राज ठाकरेंचंही मत’