मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. मात्र, आता यावरून राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रालाही तौक्ते वादळाचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. गुजरातचा PM गुजरातच्या दौऱ्यावर…बाकीची राज्य वाऱ्यावर, अशा मोजक्याच शब्दात महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरून जोरदार टोला लगावण्यात आला आहे.
गुजरातचा PM गुजरातच्या दौऱ्यावर…
बाकीची राज्य वाऱ्यावर!!— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 19, 2021
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोदींवर टीका केली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा, गुजरातला जात आहेत. त्यांना तिकडे जायला वेळ आहे. पण महाराष्ट्रात येत नाहीत, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवीचे नेते नवाब मलिक यांनी देखील यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबाबतचा हा भेदभाव नाही का?, असा सवाल मलिक यांनी केला.
Read Also :
- ‘युट्यूबकडून मिळतात ‘इतके’ पैसे’, गडकरींनी सांगितला आकडा
- ‘बार्जमधील निष्पापांच्या मृत्यूला ONGC प्रशासन जबाबदार’
- ‘मोदी गुजरात तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा’
- ‘गतवर्षी आलेल्या निसर्ग वादळाची आधी “तातडीने” भरपाई द्या’
- ‘शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या अन्यथा…’, काँग्रेसचा मोदी सरकारला इशारा