मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे हिरा ऑईल फील्डमधील ‘बार्ज पी- 305’ वर अडकलेल्या जवळपास 184 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि शोध पथकांना यश आलं. अरबी समुद्रात अजूनही बचाव कार्य सुरुच आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ओएनजीसी प्रशासनाला जबाबदार धरत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाने याबाबत उत्तर देण्याची मागणी केली आहे.
नवाब मलिक म्हणाले की, ‘तोक्ते चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार प्रहार करणार हे संबधित यंत्रणेने सांगितलेले असतानाही ONGC ने सर्व सूचनांकडे का दुर्लक्ष केले? सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही?’ असा सवाल त्यांनी केला आहे.
Everyone was made aware of #CycloneTauktae and warnings were sent out for all to take necessary precautions. Local government agencies had made arrangements for people on coastal areas to move to safer places and fishermen were asked not to venture into the seas(1/4)@dpradhanbjp
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 19, 2021
स्थानिक सरकारी एजन्सींनी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली होती आणि मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका, असंही सांगण्यात आलं होतं. मग ONGC ने सर्व चेतावणींकडे दुर्लक्ष का केलं आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही? चक्रीवादळ सुरू होण्यापूर्वी त्यांनी सर्व कामगारांना बार्जमधून बाहेर का काढले नाही आणि किनार्यावर आणले नाही?, असा प्रश्न त्यांनी ट्विट करत विचारला आहे.
ONGC च्या निष्काळजीपणामुळेच 60 निरपराध कामगारांचे जीव धोक्यात आले. या दुर्लक्षामुळे 60 लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि बर्याच जणांनी आपला जीव गमावावा लागला, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, योग्यवेळी स्थानांतरण करण्याचा निर्णय नाही, अशा त्यावेळी बार्जवर प्रभारी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय देखील याचे उत्तर द्यायलाच हवे, असे ते म्हणाले.
Read Also :
- ‘मोदी गुजरात तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा’
- ‘गतवर्षी आलेल्या निसर्ग वादळाची आधी “तातडीने” भरपाई द्या’
- ‘शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या अन्यथा…’, काँग्रेसचा मोदी सरकारला इशारा
- ‘ठाकरे सरकार पाण्यात डुंबत बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही’
- “पोटात आहे तेच ओठात येतं”, मोदीजी म्हणाले करोना केसेस वाढवा!