मुंबई : मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर मराठा समाजाचा रोष वाढत असतनाच, आता पदोन्नतीतील आरक्षणावरून आघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्यानंतर, काँग्रेसने यावरून आक्रमक पवित्रा घेतला असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील, “पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिलं पाहिजे या मुद्यावर काँग्रेस ठाम असून, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा दिला होता.
यातच आता, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दीड महिन्यापूर्वी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्काविषयी लिहिलेल्या पत्राची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही घेतली नसल्याने, काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना काँग्रेसचे नेते आणि आघाडी सरकारमधले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी, “काही महिन्यापूर्वी आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. तसेच, ३ महिन्यातून एकदा आघाडी सरकारच्या कोअर कमिटीची बैठक घेण्याची सूचना केली होती.
मात्र, अजूनही त्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नसून, सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जात नसेल, तर काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. असं जरी असलं तरी दुसरीकडे त्यांनी, पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत काँग्रेस आक्रमक असली, तरी राज्य सरकारला धोका नाही. हे सरकार ५ वर्ष चालणार, हा वाद चर्चेतून सोडवला जाईल,” असं स्पष्ट मत मांडलं आहे.
Read Also :
- ‘आघाडी सरकारवर पवार साहेबांचा वरदहस्त; त्यामुळे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार!’
- अखेर सोलापूरकरांना दिलासा उजनीतून पाच टीएमसी पाणी उपसा आदेश रद्द
- जळगावचा बदला घेतला माथेरानमध्ये, शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपत प्रवेश
- ‘पवार साहेब! मुख्यमंत्री, विरोधी पक्ष आणि नारायण राणे यांना एकत्र आणा’ – संभाजीराजे
- ४-४ वेळा पत्र लिहून भेट दिली नाही हे सांगता, याआधी ४० वेळा भेट झाली ते का नाही सांगत?