मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून, संभाजीराजेंनी चार-चार वेळा पंतप्रधानांना पत्र लिहून देखील पंतप्रधान त्यांना वेळ देत नसल्याने, सत्ताधारी पक्षाकडून भाजप आणि पंतप्रधानांवर टीका करण्यात येत आहे. तसेच, खुद्द संभाजी छत्रपतींनी देखील यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
यावर, आता भाजपकडून पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना, “खासदार संभाजीराजेंना सर्वात जास्त सन्मान भाजपनेच दिला आहे, त्यांना चार-चार वेळा पंतप्रधानांनी भेट नाकारली असली, तरी याआधी चाळीस वेळा भेट दिली आहे,’ असं वक्तव्य केलं आहे.
तसेच, “छत्रपती घराण्याविषयी भाजपला नितांत आदर आहे. पक्षाने खासदार संभाजीराजे यांचा मोठा मान राखला आहे. त्यांना खासदार होण्यासाठी भाजपच्या कार्यालयात यावे लागू नये म्हणून, पंतप्रधानांनी त्यांना थेट राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. अहमदाबामध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत देखील सगळ्यांनी उभे राहून त्यांना सन्मान दिला होता, याबद्दल ते का सांगत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी संभाजीराजेंना केला आहे.
Read Also :
- महाविकास आघाडीचे नाराजी नाट्य; पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर अजितदादांसह अनेकांची हजेरी
- मोठी बातमी: पिंपरीच्या राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला अटक
- ठाकरे सरकारने गृह विलगीकरणाचा निर्णय बदलला, आमदार महेश लांडगेंच्या प्रयत्नांना यश
- शरद पवारांची जीवनगाथा ऑडिओ स्वरूपात, ‘या’ लोकप्रिय गायकाने दिला आवाज
- शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा