मुंबई : कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे. मागासवर्गीयांच्या पदन्नोतेतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून शिवसेनेवर आणि राष्ट्रवादीवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांयकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील आपलं मत मांडलं असून, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याच्या बातम्यांना त्यांनी फेटाळून लावल्या आहेत.
‘पवार साहेबांचे या सरकारला पूर्ण आशिर्वाद असून, त्यांच्या आशीर्वादाने हे सरकार आपला ५ वर्षांचा कायर्कल बिनधोकपणे पूर्ण करेल,’ असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, ‘मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चेसाठी इतरही अनेक विषय असल्याने, फक्त राजकारणावरच चर्चा झाली पाहिजे का?,’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आज सकाळपासूनच पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची ये- जा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सिल्वर ओकवर बोलवलं असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळीच सिल्वर ओकवर दाखल झाले होते. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काही वेळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नुकतेच भाजपचे खासदार संभाजी राजे यांनी देखील पवारांची भेट घेतली.
Read Also :
- अखेर सोलापूरकरांना दिलासा उजनीतून पाच टीएमसी पाणी उपसा आदेश रद्द
- जळगावचा बदला घेतला माथेरानमध्ये, शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपत प्रवेश
- ‘पवार साहेब! मुख्यमंत्री, विरोधी पक्ष आणि नारायण राणे यांना एकत्र आणा’ – संभाजीराजे
- ४-४ वेळा पत्र लिहून भेट दिली नाही हे सांगता, याआधी ४० वेळा भेट झाली ते का नाही सांगत?
- लक्षद्वीप प्रकरणी शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले…