नवी दिल्ली : काही महिन्यांपुर्वी लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारने नेमलेले प्रशासक प्रफुल पटेल यांची नियुक्ती केली होती. मात्र आता त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना विरोध होताना दिसत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
प्रफुल पटेल यांनी दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत अपात्र ठरवण्याचा आणि गोमांसावर बंदी घालण्याची प्रस्ताव मांडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, अॅनिमल प्रिजर्वेशन रेग्युलेशन-2021 अंतर्गत गोहत्या, गोमांस उत्पादन, परिवहन, विक्री आणि खरेदीवर बंदी आणण्यात आलीये. याला विरोधत होताना दिसत आहे. क्वांरटाईनच्या नियमात देखील तेथे बदल करण्यात आला आहे.
I would like to draw Hon'ble PM’s kind attention towards certain serious concerns raised by Shri P. P. Mohammed Faizal, MP (Lok Sabha), Lakshadweep, with regard to the policy decisions taken by the newly appointed Administrator of #Lakshadweep.@PMOIndia @narendramodi pic.twitter.com/fgCKvQMESL
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 26, 2021
लक्षद्वीप प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे स्थानिक नागरिकांचे उपजीविकेचे पारंपारिक साधनं आणि स्थानिकांची संस्कृती नष्ट होत आहे. या नियमांमुळे याआधीही अशांतता पसरली होती आणि या निर्णयांना विरोध झालाय. त्यामुळे प्रशासक पटेल यांच्या आदेशांवर आणि नियमांवर पुनर्विचार व्हावा. लक्षद्वीप प्रशासनाने हे तर्कहीन आदेश रद्द करावेत, असे शरद पवारांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
तसेच, स्थानिक मच्छिमारांची किनारपट्टीवरील साहित्यसामुग्री कसलीही नोटीस न बजावता उद्ध्वस्त करणे, अंगणवाड्या बंद करून लोकांना बेरोजगार करणे, तेथे दारूबंदी असताना नव्याने त्याबाबतची परवानगी देणे, स्थानिक डेअऱ्या बंद करून त्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू करणे, असे विविध मुद्दे त्यांनी पत्रात उपस्थित केले आहेत.
Read Also :
- ‘गायब आमदार प्रताप सरनाईक यांचा शोध घ्या’
- PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला ‘या’ देशात अटक
- ‘आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो’
- ‘इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो’
- ‘वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका’, भातखळकरांचे रोहित पवारांवर टीकास्त्र