औरंगाबाद : कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 1 जूनपर्यंत कडक निर्बंध लागू आहे. 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार की निर्बंध शिथिल होणार ? हा प्रश्न कायमच आहेत. यातच आता औरंगाबादमधील लॉकडाऊनवरून AIMIM खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे आमनेसामने आले आहेत.
जलील यांनी ठाकरे सरकारने आता कोणतीही कारवाई केली तर आम्ही 1 जुनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा इशारा दिला आहे. यावरून आता चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.
इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो. तो दुकाने उघडायला आला तर शिवसैनिक उत्तर देतील. लॉकडाऊन उघडलं तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
इम्तियाज जलील यांनी 1 तारखेला दुकानं उघडून दाखवावी. शिवसेना 1 तारखेला रस्त्यावर उतरेल, असा इशाराच चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. इम्तियाज जलीलवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.
Read Also :
- ‘वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका’, भातखळकरांचे रोहित पवारांवर टीकास्त्र
- बुलढाण्यातील 138 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव नसल्याचा प्रशासनाचा दावा, मात्र परिस्थिती वेगळीच
- नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा – अशोक चव्हाण
- कोरोनामुक्तीचा हिरवे बाजार पॅटर्न, पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- सीरम इंस्टिट्यूटची थेट पुणे शहराला लस देण्याची तयारी, मुरलीधर मोहोळ यांची माहिती