अहमदनगर : राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र सातत्याने नवे रुग्ण आढळत आहेत. अशात स्थानिक पातळीवर विविध उपाययोजनांद्वारे संसर्गाला आळा घालण्याचे काम गाव प्रशासनाकडून केले जात आहे. अशाच हिरवे बाजार पॅटर्नची देशपातळीवर चर्चा असून, पंतप्रधान मोदींपासून ते मुख्यमंत्री ठाकरेंनी याची दखल घेतली आहे.
हिवरे बाजार कोरोनामुक्त झाले असून, येथे 1 मे पासून एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील व्हीडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी गाव कसे कोरोनामुक्त झाले याबाबतची माहिती घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याची दखल घेतली.
उपसरपंच पोपटराव पवार यांनी याबाबत बोलताना याचे श्रेय लोकांचे शिस्त आणि ट्रेसिंगला दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, लोकांच्या स्वच्छतेच्या शिस्तीमुळे हे यश मिळाले. हगणदारीमुक्त याप्रमाणे आता आम्ही कोरोनामुक्त झालो आहोत. मार्च महिन्यात गावात पहिला रुग्ण आढळला त्यानंतर एप्रिलमध्ये रुग्णसंख्या एकदम वाढली. त्यानंतर 4 टीम करून सर्वेक्षण केले. या टीमनेच सर्वेक्षण, टेस्टिंग आणि रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.
या पथकांनी सर्वात महत्त्वाचे ट्रेसिंग करण्याचे काम केले. जे संशयित आहेत त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना योग्य उपचार केले. 30 एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या शून्यवर आल्याचे देखील त्यांनी सांगितले. बाहेरून आलेल्यांच्या देखील चाचण्या केल्या जातात. रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांना क्वारंटाइन केले जाते, असेही त्यांनी सांगितले.
Read Also :
- सीरम इंस्टिट्यूटची थेट पुणे शहराला लस देण्याची तयारी, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- सुबोध जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती
- तरुणाची गांधीगिरी, रुग्णांना लुटणाऱ्या हॉस्पिटलविरोधात केले ‘अर्धनग्न’ आंदोलन
- ‘गृह विलगिकरण बंद करण्याचा निर्णय व्यवहार्य नसून त्याचा पुनर्विचार करावा’
- ‘…अन्यथा लॉकडाऊन वाढवला तरी आम्ही झुगारुन दुकानं सुरु करु’