पुणे – पुणे जिल्हा हा काँग्रेस विचारांचा जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यात आजही काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. सातत्याने काँग्रेसचा झेंडा या भागात फडकत राहिला आहे आणि यापुढेही तो तसाच फडकत राहिल असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे दौऱ्यात केलं आहे.
पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी आता पक्षवाढीचे काम हाती घ्यावे. पुणे जिल्ह्याबरोबरच २०२४ साली राज्यातही काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला.
रविकांत तुपकरांच्या अन्नत्यागाला अखेर यश; शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतले ९ निर्णय
पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, उपाध्यक्ष देविदास भन्साळी, अलकाताई रुपवते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची मतं वाढली आहेत. पुणे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे, पुणे जिल्हा काँग्रेसचा पारंपरिक जिल्हा असून दुसऱ्यांना मागणार नाही, काँग्रेस येथे स्वबळावर लढेल, त्याची तयारी केली आहे.
३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम: २१ डिसेंबर रोजी होणार मतदान
काँग्रेसच्या काळात इतकी महागाई नव्हती जितकी आता आहे. काँग्रेसच्या काळात असलेला अवघ्या ३५० रुपयांना मिळणारा गॅस आता १००० रुपयांच्या वर गेला आहे. पेट्रोल सोबत डिझेल देखील १००च्या पार गेलं आहे. त्यावेळी थोडासा गॅस वाढला की आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी, इतरही काही नेते आज काहीच बोलताना दिसत नाही.
आता मात्र देशातील सर्व जे काही सरकारी आहे ते विकण्याचा घाट मोदी सरकार घालू लागलं आहे. केंद्रातील भाजपा सरकारने देश विकायला काढला आहे. रेल्वे, विमा कंपन्या, बँका, बीएसएनएल सर्वकाही विकायला काढले आहे. शेतकरी, कामगार यांना संपवायला निघाले आहेत. आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात सत्ता द्या असं देखील मत पटोलेंनी यावेळी व्यक्त केलं आहे.
Read Also :
- कोल्हापूरात काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध; भाजपच्या अमल महाडिकांची निवडणूकीतून माघार
- मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार आहे; नारायण राणेंच्या दाव्याने उडाली खळबळ
- चंद्रकांत पाटलांपाठोपाठ देवेंद्र फडणवीसही दिल्लीत दाखल; मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत?
- आठमुठेपणा घेऊन एसटी सेवा ठप्प ठेवली तर कारवाई करावीच लागेल; अनिल परबांचा इशारा
- मी भाजपात प्रवेश करतोय, म्हणताच शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे झाले अवाक्