बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या आंदोलनासाठी ओळखली जाते. शेतकरी, दुग्धउत्पादकांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून स्वाभिमानि शेतकरी संघटनेला ओळखले जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे सध्या कमालीचे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या आंदोलनाला आता यश मिळाले आहे.
आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं- सदाभाऊ खोत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलेल्या आंदोलनाला राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मध्यस्ती करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. एवढंच नाही तर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील ” तुम्ही माझ्याकडे कधीही या, आपण लवकरात लवकर तुमच्या काय मागण्या असतील त्यावर बैठक घेऊ आणि मान्य करू ” असा शब्द देखील दिला होता. त्यानुसार अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, अर्थमंत्री अजित पवार, संबंधित, सचिव आणि काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थित मंत्रालयात बैठक घेण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांनी सोयाबीन व कापूस उत्पादकांची बाजू या बैठकीत प्रखरतेने मांडली. त्यामुळे पावणेदोन तास चाललेल्या बैठकीत विविध मागण्या मान्य करत निर्णय घेण्यात आले.
रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुरेश लाड यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
मंत्रालयात झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. विशेष म्हणजे माजी खासदार राजू शेट्टी या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्यांनी पीकविम्याच्या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधलं.
बैठकीत कोणते निर्णय झाले?
१. राज्य सरकार सोयाबीन, तेलबिया-खाद्यतेलावर स्टॉक लिमिट लावणार नाही
२. अतिवृष्टीचे राहिलेले अनुदान आठवडाभरात जमा करणार, शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाला बँकांनी होल्ड लावू न देण्याच्या सरकारकडून सूचना
३. शेतकऱ्यांचा विमा नाकारणाऱ्या व खोटे रेकॉर्ड तयार करणाऱ्या कंपन्यांवर कृषी विभाग गुन्हे दाखल करणार
४. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक
५. नादुरुस्त रोहित्रे तात्काळ देणार
६. कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांचे पैसे फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा करणार
७. दोन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंत कर्जमाफी देण्यास सरकार सकारात्मक
८. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लवकर देण्याचा प्रयत्न
९.नदी काठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी दिलेली मदत अपुरी असल्याने स्वयंसेवी संस्थाकडून सीएसआर फंड उभा करणार यासाठी आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Read Also :
- अखेर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; परिवहनमंत्री अनिल परब यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
- नारायण राणेंनी सत्तेसाठी गद्दारी केली; शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
- आागामी महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा
- पुण्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस; भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
- ‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन