कोल्हापूर : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे आदेश दिल्ली येथून आल्यानंतर आज तात्काळ भाजप आघाडीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले.
राज्यात ठाकरे, पवार यांनी एकत्र यावं ही तर बाळासाहेबांची इच्छा; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची नवी दिल्लीत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळातच अमित शहा यांनी धनंजय महाडिक यांना फोन करून अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. यानंतर महादेवराव महाडिक यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न ‘या’ ठिकाणी नाहीच; लंके विरुद्ध औटी यांच्यात होणार प्रतिष्ठेची लढाई
दरम्यान, भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांकडून महाडिक यांना विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना आल्यानंतर महाडिक कुटुंबीय आणि समर्थकांची बैठक झाली. या बैठकीत महाडिक यांनी पक्षाचा आदेश मानत माघार घेण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक या पारंपारीक कट्टर विरोधकांत इर्षेची लढाई सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले होते. जिल्ह्यावर राजकीय वर्चस्वासाठी पाटील व महाडीक यांच्यात गेल्या काही वर्षापासून हाडवैर निर्माण झाले आहे. राजकीय वर्चस्वासाठी पाटील व महाडिक यांच्यात प्रचंड टोकाचे राजकारण सुरू आहे.
कोल्हापुरातील आगामी राजकीय समीकरणे घडणार महाडिक विरुद्ध पाटील लढतीतून
२०१५ मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा अमल महाडिक यांनी विधानसभा निवडणूकीत दारूण पराभव केला होता. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांचा सतेज पाटील यांनी पराभव करून बदला घेतला होता. पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांना पराभवाची धूळ चारली होती. आता पुन्हा सतेज पाटील व अमल महाडीक विधान परिषद निवडणुकीत आमने-सामने आले होते. दोघांत तुल्यबळ लढतीमुळे गेल्या काही दिवसांपासून रणधुमाळी सुरू होती. आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झडत होत्या. काटाजोड लढतीमुळे एकेक मतासाठी साम, दाम, दंड, भेद आदींचा वापर केला जात होता. परंतू निवडणूक बिनविरोधचा निर्णय झाल्याने कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला. बिनविरोधची समझोता एक्स्प्रेस यशस्वी झाल्याने सतेज पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीतील हवा निघून गेली.
Read Also :
- मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार आहे; नारायण राणेंच्या दाव्याने उडाली खळबळ
- चंद्रकांत पाटलांपाठोपाठ देवेंद्र फडणवीसही दिल्लीत दाखल; मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत?
- आठमुठेपणा घेऊन एसटी सेवा ठप्प ठेवली तर कारवाई करावीच लागेल; अनिल परबांचा इशारा
- मी भाजपात प्रवेश करतोय, म्हणताच शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे झाले अवाक्
- ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराने केलं स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील पोलिसांच्या वसुलीचा पर्दाफाश