मुंबई : विविध ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एवढंच नाही तर धुळे, अहमदनगर, नांदेड-वाघाळा, सांगली मिरज कुपवाड या महानगर पालिकांमध्ये रिक्त जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि २२ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुरेश लाड यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये बुधवारपासून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याबाबत राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी बुधवारी मुंबई येथे माहिती दिली आहे. मदान यांनी म्हटले आहे कि राज्यातील एप्रिल २०२१ ते मी २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या ८१ आणि डिसेंबर २०२१मध्ये मुदत संपणाऱ्या १८ तसेच नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी १ ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.
‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. महापालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ९ डिसेंबर अर्ज माघारीची अंतिम तारीख असणार आहे.
नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे :
ठाणे- मुरबाड व शहापूर , पालघर तलासरी , विक्रमगड , मोखाडा , रायगड खालापूर , तळा , माणगाव , म्हसळा , पोलादपूर , पाली ( नवनिर्मित ) , रत्नागिरी मंडणगड , दापोली , सिंधुदुर्ग- कसई दोडामार्ग , वाभवे – वैभववाडी , कुडाळ , पुणे- देहू ( नवनिर्मित ) , सातारा- लोणंद , कोरेगाव , पाटण , वडूज , खंडाळा , दहीवडी , सांगली- कडेगाव , खानापूर , कवठे – महाकाळ , सोलापूर- माढा , माळशिरस , महाळूंग – श्रीपूर ( नवनिर्मित ) , वैराग ( नवनिर्मित ) , नातेपुते ( नवनिर्मित ) , नाशिक- निफाड , पेठ , देवळा , कळवण , बुलडाणा संग्रामपूर , यवतमाळ- महागाव , कळंब , बाभुळगाव , राळेगाव , मारेगाव , झरी जामणी , वाशिम मानोरा , नागपूर हिंगणा , कुही , वर्धा- कारंजा , आष्टी , सेलू , समुद्रपूर , भंडारा- मोहाडी , लाखनी , लाखांदूर , गोंदिया- सडकअर्जुनी , अर्जुनी , देवरी , सावली , चंद्रपूर पोंभुर्णा , गोंडपिपरी , कोरपना , जिवती , सिंदेवाही – लोनवाही , मुलचेरा , गडचिरोली- एटापल्ली , कोरची , अहेरी , चामोर्शी , सिरोंचा , धानोरा , कुरखेडा आणि भामरागड .
Read Also :
- रविकांत तुपकरांच्या अन्नत्यागाला अखेर यश; शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतले ९ निर्णय
- अखेर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; परिवहनमंत्री अनिल परब यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
- नारायण राणेंनी सत्तेसाठी गद्दारी केली; शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
- आागामी महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा
- पुण्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस; भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा