बंगळुरू : राजकीय वर्तुळात नेहमीच काही नेतेमंडळी आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहात असतात. त्यातली काही कायम वादात देखील येत असतात. कर्नाटकचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. इश्वरप्पा यांच्या विधानांवरून देखील वाद निर्माण झाल्याची काही प्रकरणं घडली आहेत. नुकतंच इश्वरप्पा यांनी केलेलं एक विधान वादात सापडलं असून त्यावरून काँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच, इश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे इश्वरप्पा यांनी देखील “मी माझ्या विधानावर ठाम आहे”, अशी भूमिका घेतली आहे.
Some yrs back, BJP/RSS workers were killed if they spoke about Hindutva in Kerala. We didn't have the strength to hit back. Our leaders tried to pacify us then. But now if anyone touches a BJP worker, they will get the same (treatment): Karnataka Minister KS Eshwarappa (08.08) pic.twitter.com/RgetS3OmFF
— ANI (@ANI) August 9, 2021
कर्नाटकमधील भाजपाचे प्रभावी नेते आणि मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री के. एस. इश्वरप्पा यांनी रविवारी त्यांच्या शिमोगा मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी भाजपाची ताकद वाढल्याचं सांगितलं. “आज, भाजपाचा जगभरात प्रसार झाला आहे. आणि जर भाजपाच्या कार्यकर्त्याला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुणी हात जरी लावला, तरी त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचे आपल्याला आदेश आहेत. याआधी कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचे निर्देश होते. पण आता त्यांनी एकाला मारलं तर तुम्ही दोघांना मार द्या असे आदेश आहेत. आपली ताकद आता वाढली आहे. कुणीही आपल्याला त्रास देणार नाही”, असं इश्वरप्पा म्हणाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
I stand by my statement. Can we sit silently watching our women being raped?: Karnataka Minister KS Eshwarappa pic.twitter.com/iZQYSIFt7j
— ANI (@ANI) August 9, 2021
दरम्यान, केरळमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असत, असा दावा देखील इश्वरप्पा यांनी बोलताना केला आहे. “बाजूच्या केरळमध्ये जर कुठल्या कार्यकर्त्याने आरएसएसची शाखा उघडली, तर त्याची हत्या केली जात असे. आपल्याकडे प्रत्युत्तर देण्याची ताकद नव्हती. आज भाजपासोबत लाखो लोक आहेत. जेव्हा केव्हा हिंदुत्वासाठी सभा घेतली जाते, लाखो लोक जमा होतात”, असं देखील ते म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात वाद निर्माण झाल्यानंतर देखील इश्वरप्पा आपल्या विधानावर ठाम आहेत. “मी माझ्या विधानावर ठाम आहे. आपल्या महिलांवर बलात्कार होत असताना आपण शांत बसू शकतो का?”, असा प्रतिप्रश्न इश्वरप्पा यांनी केला आहे.
Read Also :
- केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे, घटना दुरुस्ती विधेयकावरून राऊतांची खोचक टीका
- शिवसेनेचे शिवाजी पार्कसोबत खास नाते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यादांच आमदार निधीतून करणार सुशोभिकरण
- कपिल सिब्बल यांच्या डिनर पार्टीत, २०२४ मध्ये भाजप मुक्तची घोषणा, अशी असणार रणनिती
- बीड जिल्ह्यामधून निघणाऱ्या डॉ. भागवत कराड यांच्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेला, पंकजा मुंडेसह कार्यकर्त्यांचा विरोध
- पुन्हा एकदा फडणवीसांची खेळी: संजय कुटे होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?