मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने २२ जिल्ह्यांमधल्या कोरोना निर्बंधांत शिथिलता आणली होती, तर ११ जिल्ह्यांमधले निर्बंध स्तर ३ वर ठेवले होते. तसेच, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामधील स्थानिक प्रशासनानेही निर्बंधांमध्ये सूट दिली होती. पुण्यातही नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याने, पालकमंत्र्यांनी काही निर्बंध हटवले. यानंतर ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना उपनगरीय रेल्वेतुन प्रवास करण्याची मुभा दिली.
अशोकराव तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान
यानंतर आज पुन्हा एकदा राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळात राज्यातील लॉकडाऊन बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील निर्बंध आता आणखी शिथील करण्यात आले असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
Maharashtra Government allows the operations of hotels and restaurants till 10 pm in the state. As of now hotels and restaurants were allowed to operate till 4 pm only. Detailed SoP to be issued shortly.
— ANI (@ANI) August 11, 2021
काय आहेत निर्बंध ?…
- कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी. दुसरा डोस घेतल्याच्या १४ दिवसांनी प्रवास करता येणार. मासिक आणि त्रैमासिक पास उपलब्ध करून देण्यात येणार. लोकलमधून बळजबरीने प्रवास केला तर ५०० रू दंड.
- हॉलमधील लग्नाला ५० % आणि मोकळ्या जागेतील लग्न सोहळ्याला २०० लोकांची परवानगी.
- शॉपिंग मॉल रात्री १० पर्यंत सुरू. दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश. दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी मॉलमध्ये जाता येईल.
- धार्मिक स्थळे, सिनेमा आणि नाट्यगृह बंद
- खाजगी कार्यालये २४ तास सुरू राहणार. एका शिफ्टमध्ये ५० % कर्मचाऱ्यांची मर्यादा.
- सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स आणि बाजारपेठा रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी.
- हॉटेल्सना आसनक्षमतेच्या ५० % आसनावर ग्राहकांना प्रवेश देण्याची मान्यता.
- जे लोक वेटिंगमध्ये, त्यांना मास्क घालणे अनिवार्य.
- वेटर आणि कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस घेणे गरजेचे.
- सर्व प्रकारच्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे डोस देण्याचे प्राधान्य.
- तिसऱ्या लाटेचा विचार करता २०० मेट्रिक टन ऑक्सीजन वाढवणार.
- १४१ ऑक्सीजन प्लांटना मान्यता.
- तिसऱ्या लाटेत ७०० मेट्रीक टन ऑक्सीजन ज्यावेळी लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लागेल.
- शाळा आणि कॉलेजच्या बाबतीत शिक्षण विभाग आणि टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची बैठक. त्यानंतर अंतिम निर्णय.
इतर महत्त्वाचे निर्णय…
- नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत
- भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव राज्यात १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा करणार
- अमरावती जिल्ह्यातील राजूरा लघु पाटबंधारे प्रकल्पास १९३.८१ कोटींची सुधारीत मान्यता.
- अनाथांना एक टक्का आरक्षण लागू करणार.
- नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारीत योजना राज्यात राबविणार.