सातारा : आपल्या बिनधास्त आणि बेधडक विधानांमुळे प्रसिद्ध असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी आता अजब विधान केलं आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं अजब विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
चंद्रकांत पाटीलांवर सव्वा रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – संजय राऊत
खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरोना विषयी पुन्हा एकदा एक अजब वक्तव्य केल आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज साताऱ्यात माध्यमांना दिली. आपल्याला कोराना होता का नाही हे माहीत नाही पण ताप असताना सुद्धा मी गार पाणी प्यायचो. त्यामुळे माझा खोकला वाढला आणि कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोणी काळजी करू नका. मला कोरोना झाला तेव्हा किती लोकांनी देव पाण्यात ठेवले मला माहीत नाही. पण, आज मी तुमच्यासमोर उभा आहे, असा मिश्किल टोला उदयनराजे यांनी लगावला.
राज्यसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून संजय उपाध्यायांचा अर्ज दाखल; कोणाचे पारडे जड ठरणार?
दरम्यान, ऑगस्टमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे संसदेचं अधिवेशन सोडून उदयनराजे साताऱ्यात परतले होते. दरम्यानच्या काळात उदयनराजे यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील 3 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर उदयनराजे भोसले पुन्हा एकदा सक्रिय झाले असून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.
प्रवीण दरेकरांना रंगलेल्या गालाचा ‘मुका’ प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांकडून एफआयआर दाखल
दरम्यान, एप्रिल महिन्यात लॉकडाऊन उठवण्याच्या मागणीसाठी उदयनराजे भोसले यांनी भिक मांगो आंदोलन केलं होतं. हाती कटोरा घेत त्यांनी सातारच्या रस्त्यावर भिक मागितली होती. त्यावेळी उदयनराजे तेथील फुटपाथवर कटोरा घेऊन बसले होते. यावेळी लोकांनी त्यांच्या कटोऱ्यात पैसे टाकले होते. ही एकूण रक्कम 450 रुपये इतकी होती. हे पैसे उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनीऑर्डर करुन उदयनराजे भोसले यांना 450 रुपये परत केले होते.
वॉर्ड-प्रभागांची कितीही ढवळाढवळ करा, मुंबई महापालिकेवर भाजपचेच कमळ फुलणार – फडणवीस
शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे म्हणाले होते.
Read Also :
- किरीट सोमय्यांचा पुन्हा कोल्हापूरला येण्याचा मुहूर्त ठरला; राजकीय वाद पेटण्याची शक्यता
- उद्धव ठाकरेंचे सल्लागार, अधिकारी अतिशय अपरिपक्व; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक
- राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर, सावित्रींच्या लेकींचे गाऱ्हाणे ‘मातोश्री ‘ ऐकणार का? – महिला आमदाराचे पत्र
- मी कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही, सोमय्या विनाकारण प्रतिमा मलिन करतायतं – अनिल परब
- शरद पवारांनी नव्हे काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला – रामदार आठवले