जळगाव: मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीतून राज्य सावरण्याचा प्रयत्न करत असताना एका बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. कोकण दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पांढऱ्या पायाचे असल्याचं म्हटलं. शिवसेनेने या आरोपांना उत्तर देत, राणे हेच पांढऱ्या पायाचे असून ते मंत्री झाल्यामुळे कोकणावर आपत्ती कोसळली असं म्हटलंय.
हे पण वाचा: “कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला घरचा आहेर
राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंवर टीका केली आहे. “कोकणासह पश्चिम महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. त्या आपत्तीतून सावरण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, विरोधकांनी यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे या आपत्तीतही राजकारण करत आहेत. नारायण राणे हे पांढऱ्या पायाचे आहेत. ते मंत्री झाल्यामुळेच कोकणावर ही आपत्ती कोसळली आहे”.
हे पण वाचा: चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल : मंत्री हसन मुश्रीफ
नारायण राणे काय म्हणाले होते?
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रविवारी तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारशी तुमचं काही बोलणं झालं का? असा सवाल राणेंना यावेळी करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांचं नाव न घेता टीका केली. कुठलं सरकार? महाराष्ट्र सरकारचे लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून आता फिरत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.
हे पण वाचा: ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
आरोप करणं योग्य नाही
कोकणात वारंवार पूरस्थिती होती. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणाले. या घटनेची कुणालाही कल्पना नव्हती. असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. डोंगराची माती खाली येईल किंवा डोंगराचा कडा कोसळेल असं कुणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे या घटनेवरून कुणावर आरोप करणं योग्य नाही. आज या दुर्घटनाग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असंही राणे म्हणाले.
Read Also :
- ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
- “राज ठाकरेंचा मलाही फोन”, भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा; राज-भाजप भेटीची तारीख ठरली?
- राज्यातल्या भाजपच्या “या” मोठ्या नेत्याचा, झारखंड सरकार पाडण्याच्या कटात हात!
- “कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला घरचा आहेर
- ‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्री बोलले, भास्कर जाधवांना दिला कानमंत्र