मुंबई: कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत. रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४० लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली.
हे पण वाचा: नागपूर महापालिका: ‘तुम्हीच उमेदवार ठरवा, आता गटबाजी खपवून घेणार नाही’ – नाना पटोले
लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून, जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
हे पण वाचा: आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या विरोधी पक्षाविषयी काय बोलावे
लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 27, 2021
हे पण वाचा: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाड दौऱ्यावर, तळीये ग्रामस्थांची करणार विचारपूस
राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. तसेच भास्कर जाधव यांच्या गैरवर्तनावरून भाजपतील अनेक नेत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता सामनामधील अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.
हे पण वाचा: भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात….
जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व त्यामुळेच सामना मध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्द होते. लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू, असे टीकास्त्र राणे यांनी सोडले आहे.
Read Also :
- लसीकरण केंद्रांवर बॅनरबाजीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने, नाना पटोलेंचा थेट आयुक्तांना फोन
- नागपूर महापालिका: ‘तुम्हीच उमेदवार ठरवा, आता गटबाजी खपवून घेणार नाही’ – नाना पटोले
- आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या विरोधी पक्षाविषयी काय बोलावे
- भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात….
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाड दौऱ्यावर, तळीये ग्रामस्थांची करणार विचारपूस