नागपूर: महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये होणारी गटबाजी, हेवेदावे, पाडापाडीचे राजकारण यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. यावेळी कार्यकर्त्यांनाच उमेदवार ठरवण्याचे आवाहन त्यांनी केले.
हे पण वाचा: नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
नाना पटोले सध्या नागपूरच्या दौऱ्यावर असून त्यांनी दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. विशेष म्हणजे मागील निवडणुकीच्यावेळी झालेल्या टोकाच्या गटबाजीमुळेच काँग्रेस नगरसेवकांची संख्या २८ येऊन ठेपली आहे. याची गंभीर दखल घेऊन भविष्यात याची पुनरावृत्ती व्हायला नको असेही पटोले यांनी बजावले.
हे पण वाचा: “कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला घरचा आहेर
शहरात दीडशे वॉर्ड आहेत, उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या हजाराच्यावर असते. एकाला तिकीट दिल्यास दुसरा नाराज होतो. पराभूत झालेला उमेदवार आधी विजयाचे मोठमोठे दावे करतो. नंतर नेते व कार्यकर्त्यांवर खापर फोडतो. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनाच उमेदवार निवडण्याची मुभा दिली जाणार आहे.
हे पण वाचा: ‘‘टप्प्यात आलेल्या भाजपचा महाविकास आघाडी सरकारकडून करेक्ट कार्यक्रम’’
कुठल्याही प्रभागात नेत्यांमार्फत उमेदवार लादल्या जाणार नाही. सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एक नाव ठरवायचे आहे. त्याला विजयी करण्याची जबाबदारी सर्वांची राहील. नंतर आमच्या नावाने बोटे मोडू नका, असे सांगून पटोले यांनी पक्षाचे प्रामाणिक काम करणार, निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्याचा महापालिकेसाठी विचार केला जाईल असे स्पष्ट केले.
हे पण वाचा: ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
समित्या स्थापन करा
दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातून सुमारे १५ नगरसेवक निवडून आणण्याची ग्वाही यावेळी विकास ठाकरे यांनी दिली. याकरिता कार्यकर्त्यांनी बूथ,वार्डनिहाय जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडव्यावा. ब्लॉक अध्यक्षांची समन्वय ठेऊन समित्या स्थापन कराव्यात असे आवाहन ठाकरे यांनी केले
Read Also :
- आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या विरोधी पक्षाविषयी काय बोलावे
- भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात….
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाड दौऱ्यावर, तळीये ग्रामस्थांची करणार विचारपूस
- आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने मदत करा, केवळ इच्छाशक्ती दाखवून चालणार नाही, राज्य सरकारकडे दरेकरांची मागणी
- नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर