मुंबई: कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत. रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४० लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाड दौऱ्यावरा करणार आहेत. तळीये ग्रामस्थांची विचारपूस करणार आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
हे पण वाचा: “राज ठाकरेंचा मलाही फोन”, भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा; राज-भाजप भेटीची तारीख ठरली?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज महाड जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून महाड जि. रायगड कडे प्रयाण. सकाळी १०.२० वा. महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे आगमन. सकाळी १०.२५ वा. पिडिलाइट विश्रामगृह येथे राखीव. सकाळी १०.२५ वा. पिडिलाइट विश्रामगृह येथून तळीये ता. महाड कडे प्रयाण.
हे पण वाचा: नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
तसेच सकाळी ११.०० वा. तळीये, ता.महाड येथे आगमन व दरडग्रस्त भागाची पाहणी. सकाळी ११.४५ वा. तळीये ता. महाड जि. रायगड येथून पिडिलाइट विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी १२.१० वा. पिडिलाइट विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १२.२० वा. पिडिलाइट विश्रामगृह येथून महाड एमआयडीसी हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी १२.२५ वा. महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे राखीव. दुपारी १२.३० वाजता महाड एमआयडीसी हेलिपॅड येथून गुहागर जि.रत्नागिरी कडे प्रयाण करतील. असा असणार आहे राज्यपालाचा आजचा दौरा.
हे पण वाचा: ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
चिपळूनमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण परिसर जलमय झाला. सर्वदूर पाणी साचल्याने तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पुराचे पाणी शहरातील अनेक भागात पाणी साचले त्यामुळे अंतर्गत मार्ग बंद झाले होते. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली गेल्या होत्या. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले.
Read Also :
- आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने मदत करा, केवळ इच्छाशक्ती दाखवून चालणार नाही, राज्य सरकारकडे दरेकरांची मागणी
- नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
- ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
- “राज ठाकरेंचा मलाही फोन”, भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा; राज-भाजप भेटीची तारीख ठरली?
- राज्यातल्या भाजपच्या “या” मोठ्या नेत्याचा, झारखंड सरकार पाडण्याच्या कटात हात!