मुंबई : कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता आजपासून राज्यात अनलॉक तसेच काही भागातील, निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. एकूण पाच स्तरात राज्य अनलॉक झालं आहे. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना निर्देश दिलेत.
कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच लेव्हल ठरवण्यात आल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.
नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी , समारंभ, सोहळे चालणार नाहीत आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. याची जिल्हा प्रशासनानं काळजी घ्यावी, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरु ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व गोष्टी त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवावं, असंही मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या आणि सावध रहा, रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Read Also :
- पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती
- “संभाजीराजे आता आमच्याच मागं येताय ना?”, मराठा आंदोलनाच्या घोषणेनंतर मेटेंची टीका
- …अन्यथा थेट जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- भाजप सत्तेसाठी तळमळतोयं, आमदारांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे – एकनाथ खडसे
- ‘काय नाटक आहे, प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात अन्….