मुंबई : काँग्रेसच्या काही विशिष्ट खात्यांसोबत निधी वाटपाबाबात दुजाभाव करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. दरम्यान, नाराजी असली तरी चर्चेतून तोडगा निघेल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली. काँग्रेसमध्ये नाराजी नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील दिली आहे.
निधी वाटपावरून महाविकासआघाडीत धुसफूस पहायला मिळतेय. सरकारमध्ये काँग्रेसच्या काही विशिष्ट खात्यांबाबत दुजाभाव होतोय ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण कालच बोललो आहोत असं ते म्हणाले. वीजबील माफ करण्याबाबत सरकारकडे पैसा नाही, महसूलही कमी आहे, तसंच इतर अनेक कारणं असल्याने सूट शक्य नाही असं ते म्हणालेत.
तर निधी वाटपावरून काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर निधी वाटप हे बसून ठरवता येते. यासंदर्भात मुख्यमंत्री सगळ्यांना बोलवून हा प्रश्न सोडवू शकतात, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
Read Also ;
मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न; संजय राऊतांचा आरोप
…मग तुम्ही सत्तेत कशासाठी बसला आहात?, चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला सवाल
फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “