राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपबरोबर जाणार, त्यांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठिंबा असल्याच्या बातम्या. आणि त्यानंतर अजित पवारांनी केलेला खुलासा या सर्व घडामोडीमुळे राष्ट्रवादीत काहीतरी घडतंय असे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार हे पण सावध झाले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या बातम्यांवर स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवार सतर्क झाल्याची माहिती समोर येत आहे. कारण गेल्या दोन दिवसांत काही आमदारांनी उघडपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे तशी संभाव्य राजकीय घडामोड घडू शकते का? याची चाचपणी आता शरद पवारांनी सुरु केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार पक्षातील सर्व आमदारांसोबत फोनवर बोलून माहिती घेत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या रंगलेल्या चर्चा आणि आमदारांचं त्याबाबत असलेले मत जाणून घेण्याचे काम शरद पवार आता करत असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार खरंच तसा काही निर्णय घेतील तर पुढील रणनीती कशी असेल, याचा विचार पवार करु शकतात.
हेही वाचा… “सर्वांचीच तोंडे बंद…”; अजित पवारांच्या खुलाशानंतर मिटकरींचा टोला
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी काल दुपारी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या सगळ्या घडामोडींवर स्पष्टीकरण दिले. अजित पवार यांनी आपल्या बंडाबद्दल निव्वळ वावड्या उठवल्या जात असल्याचे म्हणाले. जीवात जीव असेपर्यंत मी शरद पवारांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादीचेच काम करु, असेही ते म्हणाले. एकीकडे अजित पवार असे बोलत असले तरी पडद्यामागील घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीत. कारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपला जपानचा दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतल्याची बातमी समोर आली आहे.
Read also
हेही वाचा… “अजित पवारांच्या स्क्रिप्टचे रायटर फडणवीस”; सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… भावी खासदार राष्ट्रवादीचा? पुण्यात पुन्हा बॅनरबाजी..!
हेही वाचा… अजित पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक; राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देवगिरी बंगल्यावर ..!