मुंबई : औरंगाबादच्या नामांतरणाच्या विषयावर शिवसेना आणि काँग्रेसचे नाटक सुरू असून, निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकारण केलं जात आहे, शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे, अशी जोरदार टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे.
औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेना करत आहे. तर काँग्रेसने याला जाहीर विरोध केला आहे. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने आता औरंगाबादचे संभाजीनगर करा, असे म्हणायचे. म्हणजे त्यांना वाटते मतदार खूश होतील. काँग्रेसने ते करू नका असे म्हणायचे, म्हणजे त्यांना वाटते त्यांचे मतदार खूश होती. निवडणुका आल्यामुळे नूराकुस्ती आता सुरू झाली आहे. दोघांनाही या बाबतीत कुठलेच गांभीर्य नाही.
मी मुख्यमंत्री असताना औरंगाबादला रस्त्याला पैसे दिले. पण महानगरपालिकेनं ते पैसे वेळेत खर्च केले नाहीत. 100 कोटी देतो असे सांगितलं होते, पण ते आधीचे पैसे खर्च करू शकले नाहीत. 1600 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याला दिले होते. आता त्याचा वर्कऑर्डर त्यांनी केला. औरंगाबादमध्ये इतकी वर्षं सत्ता चालवूनही कुठलेही महत्त्वाचे काम न करता आल्याने अशा प्रकारची भाषा या ठिकाणी चाललेली आहे. नुसते पत्र पाठवत असतात, बाकी कुठलीही कारवाई ते करत नाहीत. केवळ निवडणुका आल्यानंतर या गोष्टी का आठवतात, असा टोला देखील फडणवीसांना सेनेला लगावला.
शिवसेनेला निवडणुकीच्या निमित्ताने गुजराती समाजाची आठवण आली ही चांगली गोष्ट आहे, असा चिमटा देखील फडणवीसांनी काढला.
Read Also :
- … आणि पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातच ड्राय रनसाठी चक्क सायकलवरून पोहचवली लस
- ‘दोन तास वर्दी बाजूला ठेवा, मग तुम्हाला दाखवतो’, मनसेचे पोलिसांना थेट आव्हान
- ‘शिवसेनेवर संगतीचा परिणाम, उद्या ते मुस्लिमांचाही मेळावा घेतील’, दानवेंचा टोला
- ‘आमच्या हातात गुजरात द्या, ‘अहमदाबाद’ला तुमचे नाव देतो’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा चंद्रकांत पाटलांना टोला
- … तर मी शिक्षा भोगायलाही तयार – गिरीश महाजन
- महिला प्रश्नांच्या अनुषंगाने मेधा पाटकरांनी घेतली यशोमती ठाकूर यांची भेट
- रोहित पवारांनी थेट अजितदादांना पत्र लिहित केली ‘ही’ मागणी