मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमरावती येथे घडलेल्या हिंसाचारावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच फडणवीसांनी वादग्रस्त विधाने करून भडकवण्याचे काम करू नये, असे मत व्यक्त केले. हे ठाकरे सरकार आहे. महाराष्ट्र कायद्यानुसार चालत आहे. येथे कारवाई करताना गट, तट, पक्ष बघितला जात नाही, असेही त्यांनी यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
रत्नागिरीतील तब्बल ८६ एसटी कर्मचारी निलंबित; संपकरी कर्मचारी मात्र आंदोलनावर ठाम
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. इथे कारवाई करताना गट, तट, पक्ष बघितला जात नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले होते, त्यांनी आगीत तेल न टाकता अमरावतीसारख्या घटना घडू नयेत यासाठी शांतता राखण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. अमरावतीसारख्या घटनेचं राजकारण, पेटवापेटवी महाराष्ट्राच्या हिताची नाही. महाराष्ट्र दंगलीसाठी ओळखला जाता कामा नये. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, असेही राऊत म्हणाले.
सोमय्यांचा अर्जुन खोतकरांवर 100 कोटी घोटाळ्याचा आरोप, खोतकर म्हणाले…
तुम्ही बघतील तर अमरावतीच्या शेजारी गडचिरोलीत याच पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. अमरावतीमध्ये दंगल कोणी घडवली, कोणत्या कारणाने पेटवली, त्यामागे कोण होते हे देशालाही माहिती आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहिती आहे आणि अमरावतीमधील जनतेलाही माहिती आहे. वातावरण शांत झाले असताना उगाचच काड्या करण्याचे काम ना इकडच्या, ना तिकडच्या लोकांनी करू नये एवढंच मी महाविकासआघाडीतर्फे त्यांना आवाहन करेल, असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला.
Read Also :
- प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड आता निश्चित; भाजपचा उमेदवारी अर्ज मागे
- ST संपाच्या तोडग्यासाठी आता पवारांचा पुढाकार; परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक
- ट्विट का जवाब ट्विटसे: मलिकांच्या ट्विटला वानखेडेंचे हिंदू संस्कृतीचे पालन करणारे फोटो टाकत सणसणीत उत्तर
- कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
- माजी खासदार राजू शेट्टी, मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या पाठींब्याने बंटी पाटलांचे पारडे जड