मुंबई – महाराष्ट्रभर कोरोनाचे (Maharashtra Corona) मोठे संकट ओढावले आहे. आता तिसरी लाट येण्याचीही भीती देखील वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीतही राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) यांच्यात घमासान युद्ध हे सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरला (Nagpur) येणारे ऑक्सिजन सिलेंडर टँकर्स गुजरातला (Gujrat) नेण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला, आता ही फसवणूक भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) दिसत नाही का? असा सवाल काँग्रेसने (Congress) विचारला आहे. (doesnt fadnavis see that oxygen tankers from nagpur moved to gujarat)
कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मात्र कर्नाटकमधून येणार ऑक्सिजनचा साठा केंद्र सरकारने थांबवला आहे. ही बातमी ताजी असताना नागपूरला नेण्यात येणारे ऑक्सिजन सिलेंडरचे ४ टँकर्स हे गुजरातला हलवण्यात येत होते. तर, अधिकचे पैसे देऊन हे टँकर्स अहमदाबादला हलवण्यात येत होते, अशी धक्कादायक बाब उघडकीस आली.
काल पश्चिम महाराष्ट्राचे टॅंकर्स कर्नाटक सरकारने रोखले आज नागपुरचे ऑक्सिजन टॅंकर्स गुजरातला नेण्याचा डाव उघडकीस आला.
मोदी सरकारने भाजपाशासीत राज्यांना महाराष्ट्रातील लोकांना मारण्याचा परवाना दिलाय का?
फडणवीसांना हे दिसत नाही का? pic.twitter.com/MpV2fpjuur
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 7, 2021
यावरून काँग्रेसने थेट देवेंद्र फडणवीसांना सवाल केला. ‘मोदी सरकारने भाजपाशासीत राज्यांना महाराष्ट्रातील लोकांना मारण्याचा परवाना दिला आहे का? फडणवीसांना हे दिसत नाही का?’ असा सवाल काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना विचारत त्यांना चांगलेच वेठीस धरले आहे.
Read Also :