मुंबई : सध्या देशात ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले असून, राज्यात देखील ‘मनोरा आमदार निवास’ प्रकल्पावरून चांगलेच राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे.
दरम्यान, भाजप कांदिवली (पूर्व) चे आमदार आणि मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी यावरून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, त्यांनी ‘मनोरा आमदार निवास’चे कंत्राट तात्काळ रद्द करा, तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अन्यथा याची तक्रार मुख्य दक्षता आयुक्तांकडे दाखल करणार असल्याचा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे.
तसेच, तत्कालीन फडणवीस सरकारने या प्रकल्पाच्या पुनर्बांधणीचा कामाकरता, सरकारी संस्था ‘नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन’ सोबत ६०० कोटींचा करार केला होता. परंतु नंतर निवडून आलेल्या आघाडी सरकारने ६०० कोटींचे कंत्राट रद्द करून, त्यात केवळ विद्युतीकरणाच्या कामाकरता तब्बल २५० कोटींचा खर्च वाढवला, तसेच, इमारतीच्या फिनिशिंगवर वास्तुविशारदांनी वाढीव 300 कोटी रुपयांचा खर्च सांगितला, त्यामुळे यात नक्कीच मोठा घोटाळा असल्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्ह्टले आहे.
यावेळी त्यांनी, दिल्लीत सुरु असलेल्या सेंट्रल विस्टा इमारतीवरून टीका करणाऱ्या, राज्यातल्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांना, “आपल्या सरकारचा ‘कंत्राट’नामा व वायफळ खर्च दिसत नाही काय? महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करण्यासाठी पैसे नसताना एवढ्या वाढीव दराने काढण्यात आलेले कंत्राट मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रद्द करावे अन्यथा या विरोधात भाजप मोठे आंदोलन करेल,” असा इशारा देखील दिला आहे.
Read Also :
- “वेळ आली तर हसन मुश्रीफांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील”
- पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन, महाराष्ट्राच्या कोरोना लढाईविषयी केले कौतुक
- ऑक्सिजन न मिळाल्याने झाला, मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा मृत्यू
- फडणवीसांनी साधला वजनदार मंत्र्यांवर निशाणा म्हणाले…
- “…तर ते माझ्या जीवाचं बरं-वाईट करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत”, अँटिलीया जिलेटीन स्फोटकं प्रकरणाला नवे वळण