सातारा – मागील कित्येक दिवसांपासून राज्याचे लक्ष हे सिंधुदुर्गाकडे लागले होते. अखेर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला ईश्वरचिठीवर विजय मिळाला आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राणेंनी म्हटले होते की सिंधुदुर्ग ही फक्त भाजपच्या विजयाची सुरुवात आहे. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असेल आणि मुख्यमंत्री देखील आमचाच असेल.
या वक्तव्यावर आता गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. नारळावरील कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरी पैलवानाशी लढत दिल्याचे सांगायचे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे केविलवाणी वक्तव्य आहे. नारळावरील कुस्ती मारून नारायण राणे हिंदकेसरी पैलवानाशी बरोबरी केल्याचा आव आणत आहेत, अशी खरमरीत टीका देसाई यांनी केली आहे.
बैलगाडा शर्यतीमुळे युवकांचा एक वर्ग वाया जाणार; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली चिंता
महाविकास आघाडीच्या दोन वर्षांच्या पूर्णतेनिमित्त राज्यात व जिल्ह्यात राबवल्या गेलेल्या योजनांच्या माहितीसाठी शासकिय विश्रामगृहात मंत्री शंभूराज देसाई यांनी काल संवाद साधला.केंद्रीय मंत्री नारायण राणेँविषयी विचारले असते त्यांनी म्हटले की गावाकडे नारळावरील किंवा बत्ताशावरील कुस्ती असते. त्याप्रमाणे नारळावरील कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरीला लढत दिली असे सांगायचे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे केविलवाणी वक्तव्य आहे असा टोला देसाई यांनी राणे कुटुंबियांना मारला आहे.
Read also:
- खासदार अमोल कोल्हे यांना डावलले त्यामुळेच शिवाजीराव आढळराव यांची बारी फसली?
- महाविकास आघाडी सरकार हद्दपार करणार; नव्या वर्षी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा संकल्प
- राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, परंतू निर्बंध अजून कडक करणार – राजेश टोपे
- पंढरपुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार खडाजंगी; दोन्ही गट आमने-सामने
- आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करतो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं