मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही बाजूंनी आम्हीच शिवाजी पार्क येथील मैदानावर दसरा मेळावा घेणार असल्याचा दावा करीत आहेत. दोन्ही बाजूंनी मैदानाच्या परवानगी साठी महापालिकेत अर्ज केले आहेत. परंतु अद्यापही कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. यावरून मनसेने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
‘अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है,
मनसेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, मुंबई मनपा व राज्य सरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळावा साठी परवानगी देऊन टाकावी आणि खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेऊ नये. तसेचही यावेळची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार आहे. अबू आझमी व ओवेसी स्टेजवर असणार आहेत का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
“सोमय्यांच्या आरोपांची तार आज छेडली, कशी नशिबाने थट्टा आज मांडली”
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथील मैदानासाठी दोन्ही बांजूनी अर्ज सादर करण्यात आले आहेत. परंतु महापालिका आयुक्तांवर दोन्ही बाजूंनी दबाव असल्याचं बोलण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी यासंदर्भातील प्रकरण हे विधी विभागाकडे पाठवलं आहे. आता त्यावर काय निर्णय होतोय. ते देखील पाहणं महत्वाचं आहे. अशातच दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने बीकेसीतील मैदानासाठी अर्ज केला होता. तो मैदान अगोदर एका खासगी कंपनी बुक केल्याने उद्धव ठाकरेंना त्या मैदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
“रामदास कदमांना तात्काळ वेड्यांच्या रूग्णालयात दाखल करा”; भास्कर जाधवांनी कदमांना फटकारलं
तसेच शिवाजी पार्क येथील मैदान मिळाले नाहीत तर ते तोडून टाकू, परवानगी कशी देत नाहीत? परवानगी द्यावीच लागेल. सर्व शिवसैनिक मुंबईत येतात. शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू, पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होतो. ही पंरपरा खंडीत होणार नाही. कायदा सुव्यवस्था बिघडली तरी इडी सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Read also
- “आज रामदास कदमांचं खरं रूप समोर आलं, उद्या सगळ्याच बंडखोर आमदारांचं रूप समोर येईल”
- “राहुल गांधींनाच काॅंग्रेसचा अध्यक्ष बनवा”; महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर
- “शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू;” परवानगी नाकारल्याने चंद्रकांत खैरे आक्रमक
- एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात..! रूपाली पाटील म्हणाल्या, “कुठे आहे रे कडकनाथा?”
- “बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर मला संपवण्याचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी हाती घेतला”; रामदास कदम